वंचित ,प्रहार जनशक्ती, बंडखोर उमेदवारांची मते कोणाच्या पथ्यावर की या पैकीच कोणी ? ही निवडणूक बुध्दिवाद्यानची....
वंचित ,प्रहार जनशक्ती, बंडखोर उमेदवारांची मते कोणाच्या पथ्यावर की या पैकीच कोणी ? ही निवडणूक बुध्दिवाद्यानची.... विलास जोशी ----------------- हिंगोली - औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची निवडणूक मंगळवारी( ता.१) होत असल्याने या निवडणुकीत वंचित व भाजप बंडखोर उमेदवाराची मते निर्णायक ठरणार असून कोणाच्या पथ्यावर पडणार हे गुरुवारी कळणार आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघात तिरंगी लढत्तीची श्यक्यता आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण ,भाजप मित्र पक्षाचे शिरीष बोराळकर ,वंचित आघाडीचे प्रा. नागोराव पांचाळ तर भाजपचे निष्ठावंत असलेले रमेश पोखळे यांना डावलल्याने ते देखील बंडखोरी करीत निवडणूक रिंगणात आपले भवितव्य अजमावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत.तसेच महाविकास आघाडीतून बंडखोरी करीत दिलीप घुगे देखील निवडणूक लढवीत आहेत.तर विध्यार्थी प्रिय, अनेक आय ए एस अधिकारी कलासेसच्या माध्यमातुन बनवलेले सचिन ढोबळे सर यामुळे तुल्यबळ लढतीत सतीश चव्हाण ह्याट्रिक करणार की, त्यांचा विजयाचा रथ रोखण्यात शिरीष बोराळकर यांना यश येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवाद...