Posts

Showing posts from October 12, 2020

कळमनुरी, ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान

Image
४० रक्तदात्यांनी केले रक्तदान कळमनुरी - जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी मध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने गरजू रुग्णांना याचा लाभ मिळावा यासाठी शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिक्षण माध्यमातून देशाचे भविष्य बळकट करण्याच्या उद्देशाने युवा पिढीला मार्गदर्शित करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे मूल्यवान कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच संस्कार स्पर्धा परीक्षा केंद्र कळमनुरीचे संचालक प्रा.भगवान मस्के यांनी १० ऑक्टोंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कोरोनाव्हायरस संसर्गजन्य महामारी मुळे देशाची परिस्थिती नाजूक झाली असून कोरोना वर मात करण्यासाठी सर्व ताकदीने लढा देणाऱ्या आरोग्य विभागाला आपल्या हातून तुटपुंजी सहकार्य व्हावे या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन कळमनुरी विधानसभेचे  आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आले, शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले याप्रसंगी प्रा. भगवान मस्के यांनी आमदार संतोष बांगर यांचा सत्कार करून मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले...

उमेद कर्मचारी महिलांचा  जिल्हाकचेरीवर मुकमोर्चा जिल्हाधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

Image
उमेद कर्मचारी महिलांचा  जिल्हाकचेरीवर मुकमोर्चा जिल्हाधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन हिंगोली - बाह्यसंस्थेला कर्मचारी नियुक्तीचे अधिकार देऊ नका ,ज्या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती थांबली आहे अश्याना पुनर नियुक्ती दयावी अशा विविध मागण्यासाठी सोमवारी उमेद महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हा कचेरीवर शांततेत मूकमोर्चा काढून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले आहे. जिल्हा प्रशासनाकडे रेणुका कानडे, जया सरकटे, मेघा शेगुकर, गंगासागर पारडकर ,सारिका लोंढे यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले की, उमेद अभियानाच्या मूळ मनुष्यबळ संसाधन संस्थेनुसारच सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदे कायम करावी, बाह्यसंस्थेला कर्मचारी नियुक्तीचे अधिकार देऊ नये, ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवास पदावरून हटविण्यात यावे, उमेद अभियानांतर्गत महिला स्वयं सहाय्यक समूह, ग्रामसंघ, प्रभागसंघांना दिला जाणारा खेळता भांडवल निधी, समुदाय निधी, जोखीम प्रवनता निधीत दुप्पट वाढ करावी, ग्रामस्तरावरील प्रेरिका यांचे रखडलेले सहा महिन्याचे मानधन तातडीने अदा करावे, प्रेरिकांचे मासिक मानधनात वाढ करून दहा हजार करा...