Posts

Showing posts from August 24, 2020

हिंगोलीत नव्याने ३६ रुग्ण पॉझिटिव्ह तर ३४ रुग्ण कोरोनामुक्त

हिंगोलीत नव्याने ३६ रुग्ण पॉझिटिव्ह तर ३४ रुग्ण कोरोनामुक्त  हिंगोली -  जिल्ह्यात सोमवारी ३६ नवीन कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर ३४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात कही खुशी कही गम अशी अवस्था निर्माण झाली आहे. पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णात  अँटीजन टेस्ट मध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही तर ३६ रुग्ण  हे आरटीपीसीआर मध्ये आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी  दिली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ३६ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहेत.यामध्ये  ३६ रुग्ण आरटीपीसीआर तापसणीत आढळून  आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसर नऊ, तर वसमत परिसर अकरा, सेनगाव  १६,असे ३६ रुग्ण   आरटीपीसीआर तापसणीत  आढळून आले आहेत. आज रोजी एकूण सुमारे ३४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.यात खालील रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये आयसोलेशन वॉर्ड हिंगोली बारा ,  कोरोना केअर सेंटर औंढा १३,तर सेनगाव येथील कोरोना सेन्टर ७ रुग्ण , कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे दोन अशा ३...

हिंगोलीत रिपब्लिकन सेनेचे पालिकेवर चिखलफेक आंदोलन

Image
हिंगोलीत रिपब्लिकन सेनेचे पालिकेवर चिखलफेक आंदोलन पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले   हिंगोली - शहरातील बौद्ध वस्त्यातील रस्त्यांची कामे सुरू करावी,यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने सोमवारी (ता.२४) हिंगोली पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढून चिखलफेक आंदोलन सुरु केले असता, पोलिसांनी आंदोलन कर्त्याना ताब्यात घेत नंतर सोडून दिले.यावेळी पुरुषासह महिलाही सहभागी झाले होते. रिपब्लिक सेनेचे जिल्हा अध्यक्ष किरण घोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध मागण्यासाठी पालिकेवर मोर्चा काढून चिखलफेक आंदोलन करण्यात आले.यावेळी पालिका प्रशासनावर जोरदार हल्ला चढविताना म्हणाले की,  शहरातील शाहूनगर, सम्राटनगर ,आंबेडकरनगर,कमला नगर, सिद्धार्थनगर,बावनखोली,आदी भागात मागील १५ ते २५ वर्षा पासून नागरिकांनी प्लॉट खरेदी करीत घरे बांधली,परंतु पालिका प्रशासन हेतूपरस्पर बौद्ध वस्त्यात लक्ष देत नसल्याने या भागातील नागरिकांना पावसाळ्यात येजा करण्यासाठी चिखल तुडवीत मुख्य रस्ता गाठण्याची वेळ आली आहे.याकडे मात्र ना लोक प्रतिनिधी, ना पालिका प्रशासनाने आजपर्यंत केवळ शहरातील मुख्य रस्ते सोडले तर आजही अनेक वस्त्यात ...