Posts

Showing posts from August 16, 2020

हिंगोलीत नव्याने ४४ पॉझिटिव्ह

हिंगोलीत नव्याने ४४ पॉझिटिव्ह हिंगोली, -  जिल्हात  रविवारी (ता.१६)  नव्याने ४४  कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून ३७ जणांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.   त्यापैकी २९ हे रेपिड अॅन्टीजन टेस्टद्वारे व १५ रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले. तर ३७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली.   आजपर्यंत जिल्ह्यात एकुण ११७८ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ७८९ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण ३७७ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि बारा रुग्णांचा आतापर्यंत मृत्यु झाला.

दोन लाखापेक्षा अधिक गरजवंतांना शिवभोजन थाळीचा आधार

दोन लाखापेक्षा अधिक गरजवंतांना शिवभोजन थाळीचा आधार हिंगोली -  जिल्ह्यात शिवभोजन योजनेतंर्गत लाँकडाऊन कालावधीत शिवभोजन योजनेचा दोन लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांनी दिली. शासनातर्फे गरीब व गरजु व्यक्तीना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सात माहिन्याखाली शिवभोजन ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा आजपर्यंत लाभार्थ्यांनी मोठा लाभ घेतला आहे.  लाँकडाऊन कालावधीत गरजुना याचा फायदा झाला आहे. जिल्ह्यात या योजनेत  नऊ केंद्रामार्फत दोन लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. या केंद्रात हिंगोली येथे तीन यात साई माऊली यांच्याकडे दोनशे थाळीचे वाटप केले जाते. तर सुभाष वर्मा व साई भोजनालय यांना प्रत्येकी शंभर थाळीचे उद्दिष्ट आहे. कळमनुरी येथील प्रकाश भोजनालय  व जय माता बचतगट यांना प्रत्येकी ७५ थाळी देण्यात आल्या आहेत. औंढा नागनाथ येथील व्यंकटेश रेस्टॉरंट व जय मल्हार ग्रामविकास प्रतिष्ठान यांना प्रत्येकी ७५ थाळी तसेच सेनगाव व वसमत येथेही ७५ थाळी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ला...

कळमनुरी, १८ वर्षीय युवकाचा विहिरित बुडुन मृत्यु

१८ वर्षीय युवकाचा विहिरित बुडुन मृत्यु कळमनुरी -  शहरातील बिलालनगर  भागात राहणारया १८ वर्षीय युवकाचा  शेतातील विहिरीत  बुडुन मृत्यु झाल्याची १६ ऑगस्ट रोजी  दुपारी  दोनच्या सुमारास घडली.  या बाबत सविस्तर माहिती अशी कि, शहरातील बिलाल नगर येथील  सय्यद तौखीर सय्यद जावीद वय १८ हे दुपारी  वाई शिवारातील अफरोज पठाण यांच्या शेतात कामा साठी गेला होता  शौचास जातो म्हणून गेला पण खुप वेळे पर्यंत परतला नाही शोध घेतला असता शेतात असलेल्या विहरी जवळ त्याचा शर्ट आढळून आला   यामुळे गोताखोर तुळशिराम भिसे, अप्पा कदम, कांता पाटिल,  पठान,  शेख मुख्तार,  फारुक शेख, ईम्रान नाईक यांनी पाण्यात उतरुन शोध घेतला असता दोन तासाच्या परिश्रम नंतर सय्यद तौखीर याचा मृतदेह  विहिरीत हाती लागला. मयत युवक हा गरीब कुटुंबियातुन असून चार भावन्डे पैकी एका भावाचा चार ते पांच वर्षा पूर्वी तळ्यात बुड़ुन मृत्यु झाला होता .आज पुन्हा कुटुंबिया वर दुखाचा डोंगर कोसळला ,सदर घटनेची वार्ता पसरताच शहरात शोकाकुल वातावरण झाले.

जिल्हा परिषदेच्या २७० कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट निगेटिव्ह

Image
जिल्हा परिषदेच्या २७० कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट निगेटिव्ह अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास हिंगोली -  जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह ,सीईओ शर्मा यांना कोरोना बाधा झाल्याने अधिकारी,कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण पसरले होते.त्यामुळे शनिवारी भीती दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेतील २७० कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात आली, या टेस्ट मध्ये सर्वच कर्मचारी निगेटिव्ह आल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मा यांच्यासह आता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी पवार यांच्यासह कर्मचारी प्रशांत तुपकरी यांना कोरोना लागण झाली आहे. दरम्यान, यापूर्वी आरोग्य विभागात सुरुवातीला कोरोना शिरकाव झाला होता. त्यानंतर सीईओ शर्मा यांना कोरोना झाल्याने सर्व इमारत सानिटाईझ करून तीन दिवस इमारत बंद करण्यात आली होती. तसेच सर्व विभाग प्रमुखांना  क्वारंटाइन केल्याने कर्मचाऱ्यात भीती निर्माण झाल्याने कर्मचारी येत नसल्याने जिल्हा परिषदेमध्ये मागील आठ दिवसापासून शुकशुकाट दिसून येत होता. कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी व जिल्हा ...