Posts

Showing posts from August 4, 2020

दिलासादायक;  हिंगोली, मंगळवारी ३३ रुग्णाची कोरोनावर मात  तर नऊ पॉझिटिव्ह

Image
दिलासादायक;  हिंगोली, मंगळवारी ३३ रुग्णाची कोरोनावर मात  तर नऊ पॉझिटिव्ह २३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक   हिंगोली -  सामान्य रुग्णालयाच्या प्राप्त आकडेवारीनुसार  मंगळवारी ३३  रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर पुन्हा नव्याने नऊ  रुग्णाची भर पडली आहे. यातील २३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा शल्य चिकितस्क डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी सांगितले. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार ३३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये कळमनुरी कोरोना केअर सेंटर येथील सहा एसआरपीएफ जवान,तर सामान्य रुग्णालयातील २७रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये गाडीपुरा एक, इंदिरा नगर एक,नवा मोंढा दोन, आझम कॉलनी पाच, वंजारवाडा पंधरा,मेहराज कॉर्नर एक, जीप वसाहत एक,आदर्श नगर एक यांचा समावेश आहे. तसेच सोमवारी सात रुग्ण आढळून आले आहेत. तर १९ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये गाडीपुरा एक,विठ्ठल कॉलनी हिंगोली एक,नगर परिषद कॉलनी एक,पलटण हिंगोली एक अँटीजन तपासणी द्वारे पॉझिटिव्ह आला आहे.कासारवाडा एक, रेल्वे परिसर, चोंढी वसमत येथ...

लातूर जिल्हा पॉझीटीव्ह 40 तर 113 रॅपिड टेस्टचे एकूण 153

Image
लातूर, आजचे नवे पॉझीटीव्ह 40 तर 113 रॅपिड टेस्टचे एकूण 153 ( 03 ऑगस्टचे )   आजचे नवे पॉझीटीव्ह 40 तर 113 रॅपिड टेस्टचे एकूण 153 (03 ऑगस्टचे ) -------  आजपर्यंतचे एकूण रुग्ण 2698 सध्या उपचार सुरू असलेले 1093 आजपर्यंत बरे झालेले 1498 एकूण मृत्यू  107   1.  लातूर ता . - 87   2.  औसा  ता. -08         3.  उदगीर --15         4. चाकूर -- 14 ( नळेगाव 11)       5.  निलंगा ता.--05      6.  अहमदपूर ता --13       7.  शिरूर अनंत.-- 03   8.  देवणी ता. -- वाचवला 01   9.  किल्लारी -- 03   10. रेणापूर -- 00   घरी राहा सुरक्षित राहा  प्रशासनास सहकार्य करा  👉👉 👉👉👉👉

हिंगोली, आधी पगार, नंतरच माघार प्राध्यापकानी फुंकले ऑगस्ट क्रांतीचे रणशिंग

Image
आधी पगार, नंतरच माघार प्राध्यापकानी फुंकले ऑगस्ट क्रांतीचे रणशिंग         जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिले आक्रोश निवेदन हिंगोली - विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय यातील प्राध्यापक यांनी अनुदानासाठी आता पवित्र आक्रमक भूमिका घेतली असून, आता प्राध्यापकानी आपल्या हक्काच्या पगारासाठी रस्त्यावर उतरले असून आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना आक्रोश निवेदन देऊन जिल्हाकचेरी समोर आधी पगार नंतरच माघार अश्या घोषणा देण्यात आल्या. आतापर्यंत  शासनाने नुसते आश्वासन दिले पण प्रत्यक्ष हक्काचं पगार मात्र कागदावरच राहिला असून त्यासाठी संपूर्ण राज्यात ४ ऑगस्ट पासून अनुदानासाठी पुन्हा एकदा कनिष्ठ महाविद्यालय यातील प्राध्यापक बांधवांनी महाएल्गार पुकारला असून आता जोपर्यंत  अनुदान वितरणाचा शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आता माघार नाही असा पवित्रा घेतला आहे. यामध्ये १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णय नुसार प्रचलित नियमानुसार अनुदान वितरणाचा शासन निर्णय काढावा त्याचबरोबर अघोषित शाळा,महाविद...