Posts

Showing posts from July 29, 2020

लातूर जिल्ह्यात 67 रुग्ण + रॅपिड टेस्ट 35 एकूण 102 रुग्ण पॉझेटिव्ह

लातूर जिल्ह्यात 67 रुग्ण + रॅपिड टेस्ट 35 ए कूण 102 रुग्ण पॉझेटिव्ह  102 रुग्णांची अपडेट आदी येणे बाकी  ऍक्टिव्ह रुग्ण -- 683 आजपर्यंत  1898 पॉझेटिव्ह  एकूण आजपर्यंत मृत्यू - 85

हिंगोलीत नव्याने आठ कोरोना रुग्णांची भर, एकाचा मृत्यू तर ३६ रुग्णाची कोरोनावर मात 

हिंगोलीत नव्याने आठ कोरोना रुग्णांची भर, एकाचा मृत्यू  ३६ रुग्णाची कोरोनावर मात  हिंगोली, -  हिंगोली जिल्हयामध्ये बुधवारी नव्याने एकुन ८ कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत . त्यातील १ रुग्ण अॅन्टीजन तपासणीत पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे व एका कोरोना रुग्णाचा  मृत्यु झाला असून ३६ रुग्णांनी कोरोनावर  मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. आज सापडलेल्या रूग्णांत हिंगोली येथील  नाईक नगर , येथील ५९ वर्षीय महिला ,वंजारवाडा येथे १ वर्षाचा मुलगा, तलाबकट्टा येथील ३५ वर्षाची महिला, आझम कॉलनी येथे ५६ वर्षाचा पुरुष, रिसाला बाजार येथे १ पुरुष ,एस.आर.पी.एफच्या एका ३१ वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. हिवरा ता. कळमनुरी येथील ४४ वर्षीय पुरुष, वसमत तालुक्यातील शिवपुरी येथील ३६ वर्ष महिलेचा समावेश आहे.  दरम्यान, हिंगोली येथील कासारवाडा  येथील ५० वर्षीय पुरुषाचा कोरोनाच्या आजाराने मृत्यु झाला आहे.  विशेष म्हणजे आज ३६ कोरोना योध्यानी कोरोना वर विजय मिळवीत र बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात  आली आहे .  आयसोलेशन वा...

हिंगोलीत दहावीचा निकाल ९१.९३ टक्के 

हिंगोलीत दहावीचा निकाल ९१.९३ टक्के  यंदाही मुलापेक्षा उत्तीर्ण होणाचे मुलींचे प्रमाण अधिक  हिंगोली -  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा औरंगाबाद शिक्षण विभाग मंडळाच्या वतीने  मार्च-एप्रिल २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीचा  निकाल बुधवारी मंडळाने जाहीर केला असून हिंगोलीचा निकाल ९१.९३ टक्के लागला आहे. यंदाही मुला पेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलींचे अधिक असल्याने मुलींनी बाजी मारल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला मार्च-एप्रिल महिन्यात सुरुवात झाली. या परीक्षा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी ,जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी पी. बी.पावसे ,संदीप कुमार सोनटक्के यांनी कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा घेण्यात आल्या. जिल्ह्यात दहावीसाठी  सोळा हजार ४९६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी १६ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी ५३ केंद्रावर परीक्षा दिली. यापैकी १४ हजार ९८८विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. दरम्यान, हिंगोली तालुक्यात  ४१३२ विद्यार्थ्या परीक्षेला बसले होते...