Posts

Showing posts from June 23, 2020

दिलासादायक ; वसमत येथील एका रुग्णाची कोरोनावर मात

Image
दिलासादायक ; वसमत येथील एका रुग्णाची कोरोनावर मात जिल्ह्यात कोरोना बाधित२४ रुग्णावर उपचार सुरू हिंगोली - जिल्हा समान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार घेत असलेल्या वसमत येथील सम्राट कॉलनीतील रुग्ण मंगळवारी ठणठणीत बरा झाल्याने त्यास सुट्टी देण्यात आली. आजघडीला जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर येथे एकूण२४ रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील आयसोलेशन व कोरोना केअर सेंटर मध्ये एकूण२४८ रुग्ण आहेत. त्यापैकी२२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आजच्या घडीला एकूण२४ रुग्ण कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू  आहेत.वसमत केअर सेंटर येथे एकूण कोरोना संक्रमित तीन रुग्णावर उपचार सुरु आहेत यामध्ये बुधवार पेठ एक, मुरुम्बा एक, चंद्रगव्हाण एक यांचा समावेश आहे. यांना कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नसल्याचे सांगण्यात येते. तसेच कळमनुरी येथील कोरोना केअर सेन्टर येथे एकूण दहा रुग्ण आहेत. यामध्ये काजी मोहल्ला दोन, टव्हा एक, कवडा पाच, तर गुंडलवाडी दोन यांचा समावेश आहे. तसेच कळमनुरी येथील डेडीकेटेड हेल्थ सेंटर येथे त...

लातूर 5, उदगीर 01, औसा 04, पॉझेटिव्ह

Image
दिनांक 23.06.2020 लातूर 5, उदगीर 01, औसा 04, पॉझेटिव्ह   लातूर 91  पैकी 71 निगेटिव्ह 10 पॉझिटिव्ह 10 Inconclusive वृत्त क्रमांक:-                दिनांक 23 जून 2020 *लातूर 91 स्वाबपैकी 71 निगेटिव्ह, 10 पॉझिटिव्ह तर 10 अनिर्णित* *आज उदगीर येथील 4 व लातूर येथील 3 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून सुट्टी* *जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 75, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 158 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 13* लातूर, दि.23(जिमाका):- आज दिनांक 23 जून 2020 रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत जिल्ह्यातून 91 व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते. त्यापैकी 91 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह, 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर 10 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आलेले आहेत.           विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेतील 23 व्यक्तींचे स्वाब  तापसणीसाठी आले होते त्यापैकी 20 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा  अहवाल पॉझिटिव्ह( पूर्वीचाच रुग्ण) आला असून ...

हिंगोली : मारहाण प्रकरणात अंतुलेनगरच्या मुख्याध्यापिका निलंबित

मारहाण प्रकरणात अंतुलेनगरच्या मुख्याध्यापिका निलंबित  मारहाण प्रकरण भोवले ,सीईओनी काढले निलंबनाचे आदेश हिंगोली - अंतुलेनगर  येथील जिल्हा परिषद शाळेतील दिव्यांग प्राथमिक पदवीधर शिक्षकास मारहाण प्रकरणात याच शाळेतील मुख्याध्यापिकेस सीईओ शर्मा यांनी निलंबित केल्याचे आदेश शुक्रवारी (ता.१९) काढले असून तसे शिक्षण विभागाला काळविले आहे.त्यामुळे हे प्रकरण  मुख्याध्यापिकेच्या चांगलेच अंगलट आले आहे. येथील दिव्यांग  प्राथमिक पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर ठाकरे हे (ता.१) ओक्तोम्बर रोजी शाळेत कार्यरत असताना याच शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती वसुधा नामदेवराव कानडे यांनी फोन करून त्यांचा मुलगा व इतर बाहेरील व्यक्तींना शाळेत बोलावून ठाकरे यांना जबर मारहाण केली होती. त्यामुळे हे प्रकरण विभागीय आयुक्त कार्यालया पर्यंत धडकले .या प्रकरणाची विभागीय आयुक्ताने शिक्षण विभागाला करण्याचे काळविले होते.त्यानुसार हिंगोली गट शिक्षणअधिकारी यांनी तसा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर केला होता. त्यानुसार मुख्याध्यापिकेने शालेय शैक्षणिक दृष्ट्या पदास न शोभणारे अशोभनीय गैर वर्तन केल्याने जिल्हा परिषद सेवा वर्तणूक...

घोषणाबाजी करीत खुर्च्यांची केली  तोडफोड   जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील प्रकार

Image
घोषणाबाजी करीत खुर्च्यांची केली  तोडफोड   जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील प्रकार ,स्वाभिमानी शेतकरी संघटना हिंगोली - शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे ,कृषी विभागाचे करायचे काय खाली मुंडके वर पाय अशा घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयात येऊन मंगळवारी खुरच्याची तोडफोड करून चालू असलेली सभा उधळून लावली असल्याचा प्रकार घडला. येथील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात मंगळवारी( ता.२३) तीनच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकीने यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कार्यालयावर पाच ते सहा कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील सेनगाव, हिंगोली, वसमत, कळमनुरी तालुक्यात महाबीज मंडळाचे, अंकुर कंपनी आदींच्या निकृष्ट  बियाणांची पेरणी केली असता मात्र हे बियाणे उगवले नसल्याची विचारणा कृषी अधिकारी विजय लोखंडे यांच्याशी केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे  दिल्याने कृषी विभागात सुरु असलेल्या सभेत शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी घुसून घोषणाबाजी करीत खुर्च्यांची तोडफोड करीत सभा उधळून लावल्याने हा गोंधळ तासभर सुरु...

मुंबई, औरंगाबाद येथून गावी परतलेल्या आठ जण कोरोना पॉझिटिव्ह

Image
चिंताजनक ; हिंगोलीत पुन्हा मुंबई, औरंगाबाद येथून गावी परतलेल्या आठ जण कोरोना पॉझिटिव्ह कोरोना बाधितांची संख्या गेली२५ वर हिंगोली -  मुंबई येथून कळमनुरी येथे क्वारंटाइन केलेल्या सात जणांना तर औरंगाबाद येथून वसमत येथे गावी परतलेल्या २८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल सोमवारी रात्री प्राप्त झाला. यात दोन किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. आता कोरोना बाधित रुग्ण संख्या २५ पोहचली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी मंगळवारी (ता.२३) दिली. परत पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. वसमत येथील क्‍वारंटाईन सेंटर अंतर्गत चंदगव्हाण गावातील  एका ३८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण  झाली आहे. सदरील व्यक्‍ती औरंगाबाद शहरातून गावात  परतला आहे. कळमनुरी क्‍वारंटाईन सेंटर अंतर्गत सात व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाली आहे. यातील पाच  व्यक्‍ती कवडा गावातील रहिवासी असून सर्व पुरुष २१,२८,२१,१६ वर्षाचे आहेत. हे सर्वजन मुंबई येथून गावाकडे परतले आहेत.  दोन व्यक्‍ती गुंडलवाडी गावातील रहिवासी असून दोघेही  किशोरवयीन म...