Posts

Showing posts from June 20, 2020

दिलासा ; हिंगोलीत नऊ रुग्णाची कोरोनावर मात 

Image
दिलासा ; हिंगोलीत नऊ रुग्णाची कोरोनावर मात  २८ कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू हिंगोली -  शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डातील कोरोना चे नऊ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये कालगाव सहा, सिरसम एक, ब्राह्मणवाडा एक, सुकळी एक, या रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या२३८ झाली असून यातील२१० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला केवळ जिल्ह्यात२८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु असल्याने जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित असलेल्या रुग्णावर कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये वसमत चार रुग्ण असून कुरेशी मोहला एक, बुधवार पेठ एक, अशोक नगर एक, मुरुम्बा एक यांचा समावेश आहे. तसेच कळमनुरी केअर सेंटर येथे एकूण पाच रुग्णावर उपचार सुरू आहेत. यामध्ये दाती तीन, डोंगरकडा एक, टव्हा एक, यांचा समावेश आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर असून कोणतेही गंभीर लक्षणे नाहीत. याशिवाय कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत दोन रुग्ण भरती केले असून यात कन...

लातूर - श्याम नगर, अजिंक्यसिटी, मोती नगर, औराद शा. 01, औसा 01, एकूण 05 +Ve

Image
दिनांक 20.06.2020   08. 00 PM लातूर 109  पैकी  100 निगेटिव्ह 05 पॉझिटिव्ह 04 Inconclusive लातूर - श्याम नगर, अजिंक्यसिटी, मोती नगर, औराद शा. 01, औसा -malkondgi 01,  एकूण 05 +Ve  एकूण 226 ऍक्टिव्ह 67 डिस्चार्ज 146 मृत्यू 13 विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 34 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 30 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 02व्यक्तींचे  अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 02 व्यक्तींचे अहवाल inconclusive आले आहेत. लातूर पोलीस खात्यात्यातील कर्तव्यावर असलेल्या पोलीस कोरोना  योध्यास कोरोनाची लागण झाली आहे..  पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीपैकी एक व्यक्ती मोती नगर लातूर व दुसरी व्यक्ती अजिंक्य सिटी लातूर येथील आहे. महानगरपालिकेकडून तापसणीसाठी आलेल्या 08 व्यक्तीच्या स्वबपैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तो व्यक्ती श्याम नगर लातूर येथील रहिवासी आहे अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. पाच रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल...

हिंगोलीत पोलीस जमादाराची गोळी झाडून आत्महत्या

Image
हिंगोलीत पोलीस जमादाराची गोळी झाडून आत्महत्या ,पोलीस दलातील दुसरी घटना पोलीस दलात एकच खळबळ, कारण स्पस्ट नाही  हिंगोली - येथील पोलीस मुख्या लयातील अरमोरर विभागात कार्यरत असलेले पोलीस जमादार यांनी स्वतःवर शनिवारी दुपारी कार्यालयातच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. कारण मात्र अद्याप स्पस्ट झाले नाही. परंतु या आत्महतेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.पोलीस दलातील सहा वर्षनंतर ही दुसरी घटना आहे. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार येथील पोलीस मुख्यालयात( अरमोरर) शस्त्र दुरुस्ती विभागात कार्यरत असलेले पोलीस जमादार जितेंद्र साळी वय (४३) हे आपल्या विभागात शनिवारी कर्तव्य बजावत होते. त्यांचा स्वभाव ही प्रेमळ होता.अचानक स्वतःच्या छातीवर गोळी झाडल्याचा आवाज कार्यालयातील इतर विभागातील कर्मचाऱ्यांना आला असता,कर्मचाऱ्यांनी तातडीने अरमोरर विभागाकडे धाव घेतली असता पोलीस जमादार रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.या घटनेची माहिती  पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांना देण्यात आली.घटनस्थळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, डीवायएसपी रामेश्वर वैन्जने आदींनी भेट दिली. त्यानंतर पंचनामा करण्याचे काम...

शाळा सुरू करण्याबाबत शाळा समितीचा अभिप्राय घ्या

शाळा सुरू करण्याबाबत शाळा समितीचा अभिप्राय घ्या सीईओ शर्मा यांचे मुख्याध्यापकाना पत्र हिंगोली -  कोरोनाचा प्रादर्भावाच्या प्रार्श्वभुमीवर शाळा सुरू करण्या बाबत शाळा व्यवस्‍थापन समितीचा स्‍वयंस्‍पष्ट अभिप्राय सादर करण्याच्या सुचना मुख्याध्यापकांना मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी एका पत्रकाद्वारे शुक्रवार (ता. १९) केल्या आहेत.   शासन निर्णयानुसार (ता.15) जुन बालकांचा मोफत व सक्‍तीचा शिक्षणाचा हक्‍क अधिनियक 2009 प्रमाणे जिल्‍ह्‍यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्‍थापनाच्या शाळाच्या मुख्याध्‍यापकांनी आपल्या शाळा व्यवस्‍थापन समिती, शाळा समिती, शिक्षक पालक सभाच्या सुरक्षीत शारिरीक अंतर ठेवून किंवा व्हीसी व्हॉटअसपद्वारे आयोजीत कराव्यात. आपल्या शाळेत विलीकरण कक्ष सुरू असल्यास गावाती अन्य ठिकाणी सभेचे आयोजन करावे सदर सभेत शासनाच्या परिपत्रकाचे वाचन करावे त्‍याअनुषंगाने सभेत सर्वकष चर्चा घडवून आणावी, या सभेत परित्रत्रकाचे वाचन करावे. यात शाळा सुरू करणे बाबतचा स्‍वयंस्‍पष्ट अभिप्राय घेण्यात यावा व त्‍या बाबतचा अहलवा आपले गटाचे गट शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करावा सदरील अभियाप...

हिंगोली, पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

Image
पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला  कळमनुरी  - तालुक्यातील आसोलावाडी परिसरात पती-पत्नी बैलगाडीने शेतात जाताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याची घटना शुक्रवारी घडली होती. रात्री अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. मात्र, शनिवारी पहाटेपासून शोध घेतला असता सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास महिलेचा मृतदेह सापडला असून बचाव पथकाकडून पतीचा शोध घेणे सुरू आहे.  जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. अशातच कुंडलिक गोविंदा असोले आणि त्यांची पत्नी धुरपताबाई हे दोघेही शेताकडे जात असताना मात्र, बुडकी ओढ्यात मध्यभागी गेल्यावर अचानक पूर आला. आणि पाहता क्षणी दोघेही पुरात वाहून गेले. काल रात्रीपर्यंत दोघांचा पाण्यात शोध घेतला होता. मात्र, अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.शनिवारी पहाटे घटनास्थळी बचाव पथ दाखल होऊन शोधकार्य सुरू केले. त्यावेळी धुरपताबाई यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला, तर कुंडलिक यांचा अद्यापही शोध लागला नाही. त्यामुळे ओढ्याचे पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागत आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, त...