Posts

Showing posts from May 11, 2020

उदगीर येथील ११ रुग्णांची कोविडवर मात *रुगणालयातुन सुटटी मिळणार...

Image
उदगीर येथील ११ रुग्णांची कोविडवर मात *रुगणालयातुन सुटटी मिळणार, होम क्वॉरटाईनमध्ये ठेवणार                                       - पालकमंत्री अमित देशमुख  लातूर, दि.11:- उदगीर येथील कोविड १९ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २७ कोविड रुग्णांपैकी ११ जणांची प्रकृती उत्तम असुन त्यांना रूग्णालयातुन सुटटी देण्यात येत असल्याची माहिती, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हाचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.      या संदर्भाने माहिती देताना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले की, उदगीर शहर वगळता संपूर्ण लातूर जिल्हा सदया कोविड १९ मुक्त आहे.              उदगीर येथे एका महिलेस कोविड १९ ची लागण झाल्याचे निर्दशनास आले. त्यात त्यांचा मृत्युही झाला. त्यानंतर संबंधित कुटुंब परीरसरातील नागरीकांची तपासणी केली असता   आज पर्यत एकूण २७ रुग्ण आढळून आले आहेत. उदगीर येथील कोविड १९ रुग्णालयात त्यांच्यावर...

दिलासादायक ;-- हिंगोलीत १७ पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त

Image
दिलासादायक ; हिंगोलीत १७ पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल हिंगोली - मालेगाव, मुंबई येथून बंदोबस्तवरून परतलेल्या  ८८ कोरोना बाधित रुग्णापैकी सोमवारी (ता.११) जवान व इतर इतर पाच व रविवारी दोन जवान असे एकूण १७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आता ७७ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. त्यामुळे  कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वजाबाकी होत असल्याने जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी ग कोरोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाची चांगलीच डोखेदुखी वाढली होती. कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार करते की काय अशी भीती आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाला लागली होती .मात्र जिल्हाधिकारी रुचेश  जयवंशी यांनी वेळीच तातडीने आरोग्य यंत्रणेच्या बैठका घेत त्यांचा चांगला समाचार घेत रुग्णाकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे बेरजेचे वजाबाकीत होण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील पहिला कोरोनाधित आढळलेल...

आज उदगीर येथुन तबल ५१ दिवसानंतर 13 विद्यार्थी व 11 मजूर नागपूरला एस.टी(बस) ने रवाना

Image
आज उदगीर येथुन तबल 51 दिवसानंतर 13 विद्यार्थी 11 मजूर नागपूरला एस.टी(बस) ने रवाना उदगीर (संगम पटवारी )         संपूर्ण देशात कोरोना महामारी लागण झाली आहे त्याला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले त्यामुळे वाहतूक बंद आहे. परगावी व परजिल्हयात विविध कामासाठी असलेले तसेच शिक्षणासाठी विद्यार्थी हे आपल्या गावी परत जाऊ शकत नव्हते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने याची खबदारी घेतली होती. पण आज लॉक डाऊनला ५१ दिवस होत असून  या काळात नागरिकांना राहण्यासाठी व जेवणासाठी वन वन भटकावे लागत होते. यामुळे मजूर, कामगार आपल्या कुटुंबासोबत हजारो कि मी चा प्रवास पायी चालण्यासाठी निघाले. यात विद्यार्थीही आपला पायी रास्ता चालू ठेवला होता. या गंभीर परीस्थितीची दखल घेत सरकारने नागरिकांना आपापल्या गावी पाठवण्याची व्यावस्था सुरू केली. यात कांही जण खाजगी वाहनांने तर कांहीना रेल्वे, एस.टी. बसची मोफत सोय करण्यात आली. उदगीर येथेही  शिक्षण घेण्यासाठी असलेले कांही  विद्यार्थी व नागरीक  आपल्या गावी जाण्यासाठी शासनाच्या दारी पायपीठ करत होते. यापूर्वी न.प. च्या शासकीय ...

...साहेब, तुमच्या पाया पडतो परंतु एक वेळ सोडा मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांचा पोलिसांकडे टाहो

Image
. ..साहेब, तुमच्या पाया पडतो परंतु एक वेळ सोडा मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांचा पोलिसांकडे टाहो हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरासह जिल्ह्यात लॉक डाऊन सुरु आहे. तरी देखील नागरिक मॉर्निंग वॉकच्या नावाखाली विनाकारण फिरत असताना सोमवारी( ता.११) पोलीस पथकाने कारवाई करून शहर पोलीस ठाण्यात आणले असता नागरिकांनी टाहो फोडत साहेब तुमच्या पाया पडतो परंतु एक वेळ माफ करा अशी विनवणी केली. जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, महसूल, पालिका प्रशासन वेळोवेळी सांगत आहे, अत्यावश्यक काम असेल तर बाहेर पडा अन्यथा विनाकारण बाहेर पडू नये,घरी थांबा, प्रशासनाला सहकार्य करावे असे सांगून देखील काही महाभाग सकाळी मॉर्निंग वॉक ,तर संध्याकाळी एव्हीनिंग वॉक चे कारण पुढे करीत घराबाहेर पडत आहेत. अनेक वेळा मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना दम देऊन दंड आकारून सोडून दिले तरी परत परत नागरिक पुन्हा त्याच चुका करून कोरोनाला आमंत्रित करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वी शहर पोलीस व पालिका कर्मचारी पथकाने अनेक विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली. उठाबशा काढायला लावल्या,दंड आकारला ,असल्याच...