Posts

Showing posts from May 10, 2020

उदगीर मध्ये तीन दिवसांमध्ये रेडझोन भागात अधिक कडक बंदोबस्त

Image
उदगीर (संगम पटवारी) : शहरात कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी (ता.१०) पर्याय संचारबंदीचे आदेश लागू केले होते. सोमवारपासून (ता.११) एक आठवडा अत्यावश्यक सेवेसह कृषीसेवा केंद्र सुरु करण्यासाठी आता परवानगी देण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी दिली.  शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे व रेड झोनमधील नागरिक बाजारपेठेत दाखल होत असल्याने कोरोनाचा संसर्गाचा धोका वाढला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारपासून (ता.८) तीन दिवस संचारबंदी लागू केली होती. उदगीर शहरासह शहराअंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील वस्तीमध्ये संचार  बंदीचे आदेश निर्गमित केले होते. या तीन दिवसांमध्ये रेडझोन भागात अधिक कडक बंदोबस्त लावून जाण्याचे मार्ग काटेरी कुंपणाने सील करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रभाव थोडासा कमी झाल्याने पुन्हा सोमवारपासून (ता.११) कृषीसेवा केंद्रासह अत्यावश्यक सेवेला सकाळी सात ते बारापर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे या आदेशानुसार या संचारबंदीच्या काळात फक्त शासकीय कार्यालय, त्यांचे कर्मचारी, त्यांची वाहने, ...

उदगीरचे पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह, उदगीर 27 वर 

Image
पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह, उदगीर 27 वर      आज दिनांक  10  मे 2020 पर्यंत      उदगीर चे 27  कोरोना रुग्ण (+Ve)      मृत --- 1       रि पोर्ट येणे बाकी -- 0 (प्रलंबित )      विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 33 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन 28 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 3 डॉक्टरांच्या स्वॅबची पुनर्तपासणी  करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीड 11, उस्मानाबाद 3,  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 4 असे एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले  होते त्यापैकी 46 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.             ...

दोन वर्षांच्या चिमुकल्याने दिला अग्नी ; जवान गणपत लांडगे अनंतात विलीन

Image
अमर रहे..अमर रहे.. वीर जवान गणपत लांडगे अमर रहे.! दोन वर्षांच्या चिमुकल्याने दिला अग्नी ;  जवान गणपत लांडगे अनंतात विलीन विठ्ठल पांचाळ :-- औसा प्रतिनिधी औसा तालुक्यातील लोदगा येथील जवान गणपत लांडगे हे कर्तव्य बजावत असताना सियाचीन येथे शहीद झाले त्यांच्यावर शासकीय इतमामत रविवारी सकाळी ८:३० च्या सुमारास गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.चार दिवसापासून  शहीद जवानांच्या अंतीम दर्शनासाठी प्रतिक्षेत असणाऱ्या हजारो नागरिकांनी अश्रू ढाळत अखेरची सलामी दिली. विर जवान अमर रहे,शहीद गणपत लांडगे अमर रहे,भारत माता की जय  असा घोषणा देत आपल्या सुपुत्रास अखेरचा निरोप देण्यात आला. बुधवारी पहाटे सियाचीन येथील ग्लेशियर चुम्मठाणा डेटकँम्प मध्ये आँक्शिजनच्या कमतरतेमुळे युनिट ६  महार बटालियन चे जवान गणपत लांडगे शहीद झाले  होते.कोरोना व वातावरणातील बदलामुळे पार्थिव आणण्यास विलंब झाला. आज ४ थ्या दिवसीजन्मगावी पहाटे ५:३० वाजता पार्थिव आणण्यात आले.त्यानंतर संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढून पार्थिव गावातील शिवाजी चौकाच्या बाजूस आणण्यात आले.अंत्ययात्रेत मोजकेच लोक उपस्थित होते.प्रत्येकांनी घरास...

दिलासादायक ;  हिंगोलीत चार दिवसांपासून रुग्ण संख्या जैसे थे ..! 

Image
दिलासादायक ;  हिंगोलीत चार दिवसांपासून रुग्ण संख्या जैसे थे ..! ना पॉझिटिव्ह, ना निगेटिव्ह हिंगोली -  गेली चार दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत वाढ मंदावल्याने ना पॉझिटिव्ह ,ना निगेटिव्ह अशी काहीशी अवस्था झाली असून तोडफार का होईना जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होऊन जवळपास कोरोना बाधितांची संख्या ९१ वर पोहचली होती.  जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी पाहता शतक करते की काय असे वाटत होते. मात्र जिल्हा प्रशासनाने वेळीच खबरदारी घेत  उपाय योजना केल्यामुळे बेरजेचे होणारे रूपांतर वजाबाकीत झाले आहे. त्यामुळे आजघडीला जैसे थे संख्या आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या ९१  गेली होती. यातील जालना येथील दोन एसआरपीएफ जवान यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आजघडीला एकूण ८२जवान  रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आयसोलेशन वॉर्डात भरती आहेत. भरती केलेल्या ८२ जवानापैकी ८१ हिंगोली एसआरपी एफ तर एक जालना येथील आहे. यांना कोरोनाची लागण झाल्याने भरती का...

लॉकडाऊन मुळे अडकलेल्या नागरिकांसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

लॉकडाऊन मुळे अडकलेल्या नागरिकांसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना हिंगोली -  लॉकडाऊन मुळे बाहेर जिल्ह्यातील किंवा पर प्रांतातील अडकलेल्या नागरिकांना परत आपल्या गावी जाण्यासाठी शासनाने वाहतुकीची व्यवस्था केली असून त्यासाठी संपर्क करण्यासाठी आगार निहाय नियंत्रण कक्षाची स्थापना केली असल्याची माहिती आगार प्रमुख श्री चौतमल यांनी दिली. कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात २३ मार्च पासून सर्वत्र लॉकडाऊन ,संचारबंदी लागू करण्यात आल्याने प्रत्येक जिल्ह्यात कामगार, कर्मचारी, विद्यार्थी बाहेर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अडकले आहेत.शासनाने बाहेर जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अटी व शर्तीवर  बसेसची व्यवस्था उपलब्ध दिली जाणार आहे.त्यामुळे अडकलेल्या नागरिकांना याबाबत माहिती व्हावी यासाठी परभणी विभागामार्फत वाहतूक नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. यामध्ये परभणी, जिंतूर, हिंगोली, गंगाखेड, पाथरी, वसमत, कळमनुरी, विभागीय कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. असे आहेत आगार क्रमांक ------------------- अडकलेल्या नागरिक...

बसचालकाची गळफास घेवून आत्‍महत्या

Image
बसचालकाची गळफास घेवून आत्‍महत्या हिंगोली -  कळमनुरी येथील बसचालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार (ता.9) रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कळमनुरी आगारातील बसचालक म्हणून कार्यरत असलेले पंजाब  देवकते (वय 45) यांनी शनिवार रात्री अकराच्या सुमारास घरासमोर असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच  पोलीस कर्मचारी श्री. पोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.  त्याच्या आत्महत्या कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.  रविवार (ता.10) आगारप्रमुख अभिजीत बोरीकर, अकबर पठाण, यांनी देवकते कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना कळमनुरी आगाराकडून तातडीची पाच हजार रुपयांची मदत परिवाराच्या स्वाधीन केली. दरम्यान याप्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी श्री पोटे यांनी दिली.

हिंगोली, पालकमंत्र्यांकडे निवेदनाचा महापूर

Image
पालकमंत्र्यांकडे निवेदनाचा महापूर विविध संघटनेने दिले निवेदन,काहींनी कैफियत मांडली हिंगोली -  जिल्ह्याच्या  पालकमंत्री वर्षाताई गायकवाड हिंगोली दौऱ्यावर आल्या असता, रविवारी(ता.१०) विविध संघटनांनी पालकमंत्री यांची विश्राम गृहावर भेट घेत प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी निवेदन दिले. आणि आपली कैफियत मांडली. दरम्यान,  शालेय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांची पालकमंत्री पदी निवड केल्यानंतर त्यांनी प्रथमच येत प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहन केले. त्यानंतर त्या तीन महिन्यानंतर हिंगोलीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी आल्या आहेत. कोरोनाचा प्रदुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन लागू केल्याने त्यांना महाराष्ट्र दिनी झेंडा फडकविण्या करिता येता आले नाही. त्या मुंबई येथे होत्या.आता हिंगोली येथे कोरोना बाधितांची संख्या शंभरी जवळ गेल्याने त्यांना चिंता लागली होती. तसेच जिल्ह्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाई, रोजगार हमीची कामे, पंतप्रधान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धान्य मिळते का नाही याचा आढावा घेण्यासाठी त्या आल्या असता रविवारी परतीच्या मार्ग...