Posts

Showing posts from April 21, 2020

शहरातील गल्‍लीबोळातील रस्‍ते वाहतुकीसाठी बंद ,मुख्य रस्त्याचाच होणार वापर

Image
शहरातील गल्‍लीबोळातील रस्‍ते वाहतुकीसाठी बंद ,मुख्य रस्त्याचाच होणार वापर हिंगोली नगरपरिषदेने लावले बॅरिकेट,सीसीटीव्हीची राहणार करडी नजर हिंगोली -  कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आपतकालीन परिस्‍थिती व संचारबंदीमुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्‍याअनुषंगाने मंगळवारी शहरातील गल्‍लीबोळातील रस्‍ते बंद करून रस्त्यावर  बॅरिकेट लावण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ मुख्य रस्‍ता वाहतुकीसाठी ठेवण्यात आला असून, सीसीटीव्हीची नागरिकांवर करडी नजर राहणार असल्याची माहिती सीओ पाटील यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी राज्यात आपतकालीन परिस्‍थिती व संचारबंदीची घोषणा केल्यानुसार  जिल्ह्यात कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी ,पोलीस अधीक्षक योगेशकुमार, महसूल विभाग ,आरोग्य यंत्रणा यांच्या मार्गदर्शनाखाली  सीओ रामदास पाटील यांनी  शहरातील गल्‍ली बोळात रहदारीचा वावर न होता अत्यावश्यक कारणासाठी केवळ मुख्य रस्‍त्‍यावरच वाहतूक होण्यासाठी मंगळवारपासून मुख्य रस्‍ते तेवढे वाहतुकीसाठी खुले राहणार अस...

हिंगोलीत बंदोबस्तावरून परतलेले १९० जवान विलगीकरण कक्षात 

Image
हिंगोलीत बंदोबस्तावरून परतलेले १९० जवान विलगीकरण कक्षात हिंगोली -  मालेगाव, मुंबई येथे बंदोबस्ता वरून परत आलेल्या  १९० जवानांना सोमवारी १४ दिवसासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्षात राहण्याची व्यवस्था केली  असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील दोन महिन्यांपूर्वी हिंगोली येथील राज्य राखीव बल गटाचे १९० जवानांच्या दोन अलग तुकड्या मालेगाव तर दुसरी तुकडी मुंबई येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अंतर सुरक्षा बंदोबस्ता साठी गेली होती. यामध्ये मालेगाव येथे ८३ जवान तर मुंबई येथे १०७ जवान बंदोबस्तासाठी गेले होते. मात्र त्यात कोरोना विषाणूची भर पडल्याने बाहेर राज्यातून, इतर जिल्ह्यातून परत आलेल्या नागरिकांची आरोग्य यंत्रणे मार्फत तपासणी केली जाते. आणि त्यांना १४ दिवस विलगीकरण मध्ये ठेवले जाते. बंदोबस्तावरून मालेगाव येथील८३ जणांची तुकडी रविवारी हिंगोली येथे दाखल झाली.  तर दुसरी मुंबईला गेलेली १०७ जणांची तुकडी सोमवारी सकाळी दाखल झाली.  सध्या मुंबई ,पुणे ,मालेगाव या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने त्यामुळे कोरोना संशयित तर नाहीना अशी भीती व्यक्त...