Posts

Showing posts from March 29, 2020

जुगार अड्ड्यावर छापा 46 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

Image
   हिंगोली -  जिल्‍ह्‍यात संचारबंदीचे आदेश असताना जुगार खेळणाऱ्यावर स्‍थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून जुगाऱ्याकडून 46 हजार 390 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सतरा जणाविरुध्द शनिवारी  गुन्हा दाखल केला आहे.    या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहराच्या परिसरात भास्‍कर बांगर यांच्या शेतातील धुऱ्याजवळ एका बाभळीच्या झाडाखाली काही जण जुगार खेळत असल्याची गुप्त माहीती स्‍थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्‍याप्रमाणे घटनास्‍थळी शनिवारी छापा टाकला असता यात गोपाल कुटे, आसीम पठाण, दुर्गेश मस्‍के, शाम कुटे, पुरुषोत्तम बांगर, आजीस सर्व राहणार मंगळवारा हिंगोली. लखन सांगळे राहणार भारतीविद्यामंदिर जवळ हिंगोली, शफी रफीक राहणार मंगळवारा हिंगोली, गजानन राहणार महादेववाडी, शाम थिटे राहणार मंगळवारा, अनिल काळे राहणार तलाब कट्टा, अमोल दरुगे राहणार मंगळवारा हिंगोली, विशाल सांगळे राहणार पोळा मारोती हिंगोली, शंकर सांगळे, महेश थिटे, योगेश थिटे तीघेही राहणार महादेववाडी हिंगोली, शेख इम्रान राहणार बावन खोली.    हे सर्वजन झन्नामन्ना नावाचा जुगार खेळ खेळत असताना यापैकी...

बहुर गावातही बाहेर गावातील नागरिकांना नो एंट्री

Image
बहुर गावातही बाहेर गावातील नागरिकांना नो एंट्री बाळापूर -  कोरोना विषाणूच्या भीतीपोटी आता बहुर गावातील नागरिकांनी देखील बाहेर गावातील नागरिकांना गावात येण्यासाठी प्रवेश बंदी केली असून सर्व रस्त्यावर काट्या टाकून नो एंट्रीचे फलक लावण्यात आले आहेत. कळमनुरी तालुक्यातील बाळापूर  नजीक असलेल्या बहुर गावातील नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग पसरवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाचे पालन करीत असून संचारबंदीच्या काळात स्वतःला घरात कोंडून घेतले आहेत. मात्र इतर ठिकाणी कामासाठी गेलेले मजूर किंवा नागरिकांना गावात येण्यासाठी प्रवेश बंदी केली आहे.यापूर्वी कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथील गावकऱ्यांनी देखील असाच निर्णय घेतला होता. आता त्याच धर्तीवर बहुर गावातील नागरिकांनी कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी चांगला निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात गेली आठ दिवसापासून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन सुरु केले आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुविधा वगळून इतर सेवा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील सीमा देखील बंद केल्या आहेत. रेल्वे गाड्या, बससेवा, सुद्धा बंद केल्याने जिल्ह्यातील कामानिमित्त गेलेले नागरि...

हिंगोलीत सापडला प्रथमच  विषारी दुर्मिळ साप

Image
हिंगोलीत सापडला प्रथमच  विषारी दुर्मिळ साप सर्पमित्राकडून त्या दुर्मिळ पोवळा सापास जीवनदान हिंगोली -  शहरातील हरण चौक या ठिकाणी अतिविषारी दुर्मिळ पोवळा साप सर्पमित्रांनी शनिवारी सायंकाळी पकडून त्यास जीवनदान दिले आहे. शहरातील हरण चौक परिसरात साप निघाल्याची माहिती मिळताच सर्प मित्र विजय पाटील यास काही नागरिकांनी दिली. त्यावरून विजय पाटील यांनी तातडीने आपल्या सर्पमित्राना सोबत घेऊन आला. त्यांनी या सापाला पाहता क्षणीच हा पोवळा साप असून अति विषारी असून तो दुर्मिळ असल्याचे सांगितले. हिंगोलीत हा साप पहिल्यांदाच आढळून आला आहे.काही वेळाने त्या सापाला मोठ्या शिताफीने पकडले. हा साप दीड फूट लांब असून, तपकिरी रंगाचा आहे, त्याच्या शेपटी कडील भागावर काळ्या रंगाचे ठिपके आहेत, तर तोंडाकडील भाग सुद्धा काळपट असल्याचे दिसून आले. या सापाला इंग्रजी मध्ये स्लेनडर कोरल स्नेक असे म्हटले जाते. सर्पमित्र विजय पाटील यांनी वर्षभरात हजारो साप पकडले आहेत यामध्ये कोब्रा, नाग,  फुरसे, मण्यार, घोणस या विषारी सापासह बिनविषारी साप पकडून त्यांना जीवन दान देण्याचे काम केले आहे. एकीकडे साप हा शेतकऱ्यांचा मित्र...

औंढा नागनाथ येथील बाजारात खरेदीसाठी उडाली झुबंड

Image
औंढा नागनाथ येथील बाजारात खरेदीसाठी उडाली झुबंड औंढा नागनाथ -   कोरोना  विषाणूच्या संसर्गाने जगात थैमान घातले आहे. आता या विषाणूचा प्रभाव देशातील विविध राज्यात वाढत आहे. कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी देशासह राज्यांमध्ये 14 एप्रिल पर्यंत लाँकडाउन करण्यात आले आहे. असे असतानाही येथे भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची झुबंड उडाली होती.  कोरोना  विषाणूच्या व्हायरसने जगभरातील हजारो नागरिकांचा बळी घेण्याचे काम मागील काही महिन्यापासून सुरू आहे. कोरोना  विषाणूंच्या संसर्गाने देशातील विविध राज्यात पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्य सह जिल्ह्यात तालुक्यात शासनाच्यावतीने 31 मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 14 एप्रिल पर्यंत देशभरात लाँकडाउन  केले आहे. संचारबंदी लागू असल्याने गर्दी टाळण्यासाठी औंढा नागनाथ येथील डॉ. हेडगेवार चौक ते नगरपंचायत या रोडवर  विक्रीसाठी विक्रेत्यांनी भाजीपाला आणला होता. यावेळी भाजीपाला विक्रेत्यांने हि मास्क लावलेले नव्हते तसेच सँनिटायझरचा वापर ही करण्यात येत...