Posts

Showing posts from March 28, 2020

एमआयटी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी १०० बेडचे स्वतंत्र कक्ष

एमआयटी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी १०० बेडचे स्वतंत्र कक्ष एमआयटीचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड लातूर -  लातूर येथील एमआयटी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी अद्यावत सोयींनीयुक्त शंभर बेडचा स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला असल्याची माहिती एमआयटीचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड यांनी दिली.      कोरोना या या विषाणूने भारतासह संपूर्ण जगात हाहाकार माजला असून करोना विरुद्धचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू झाला असून पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसाचा लॉकडाऊन केले आहे. या आजारावरील रुग्णांसाठी प्रशासनाच्या वतीने अनेक प्रयत्न केले जात आहे.           लातूर येथील एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कोरोना रुग्णासाठी स्वतंत्रपणे शंभर बेडची  व्यवस्था करण्यात आली आहे याकरिता स्पेशल सहा रूम निर्माण करण्यात आल्या  असल्याचे सांगून रमेशअप्पा कराड म्हणाले की तज्ञ डॉक्टर सह इतर कर्मचारी, व्हेंटिलेटर, ऑक्सिज...

आगीत जळालं घर, दारापुढची म्हैस होरपळून दगावली.

आगीत जळालं घर, दारापुढची म्हैस होरपळून दगावली.   उदगीर (संगम पटवारी)तालुक्यातील हेर येथे शुक्रवारी (ता.27) रात्री दोनच्या सुमारास लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. घरासमोर बांधलेली एक म्हैसही आगीत होरपळून दगावली आहे.  हेर गावातले रहिवासी संतोष सोपान सुर्यवंशी, शितल सुर्यवंशी, भक्ती सुर्यवंशी, पुनम सुर्यवंशी, महारूद्र सुर्यवंशी हे सर्व जण राञी जेवण करून अंगणात झोपी गेले. रात्री बाराच्या सुमारास वादळ, सोसाट्याचा वारा सुटला होता. तेव्हा या वादळवाऱ्यात अचानक घराला आग लागली व जोराचा वारा असल्याने ती चांगलीच भडकली.  या आगीत सर्व संसारोपयोगी साहित्य, घरातील सोयाबीन, तूर, उडीद, ज्वारी, गहू, दाळी, कपडे, नगदी रक्कम आठ हजार, चाळीस पत्रे, एक तोळा सोने, शिलाई मशीन, हे काही वेळेतच जळून खाक झाले. तसेच घरासमोर बांधलेली एक 70 हजार रुपये किंमतीची म्हैसही दगावली आहे. म्हशीची पाहणी पशु पर्यवेक्षक नारायण मुळे यांनी सुर्यवंशी यांच्या घरी जाऊन केली. या आगीत सुर्यवंशी यांचे एकंदरीत तीन लाखाचे  नुकसान झाले आहे. पंचनामा करण्यासाठी मंडळ अधिकारी पंडीत जाधव, कनिष्ठ अभियंता सतिष ज...

उदगीरात भाजी विक्री फ़क़्त जि.प.मैदानावर :- न.पा.मुख्याधिकारी भरत राठोड़

Image
 :- न .पा.च्या वतीने जि.प.मैदानावर मर्किंग,100 वितरक बसतील असी वेवस्था, ठेलेवाल्याना  व भाजी विक्रेत्याना प्रशासनाची सक़्त ताकीत  उदगीर(संगम पटवारी) कोरोना च्या प्रादुर्भावा मुळे संसर्ग होऊ नये म्हणून नगर पालिका प्रशासन सतर्क़ असुन भाजी खरेदी साठी भाजी मंडई व इतर ठिकाणी जी गर्दी होत होती ती कमी करन्या साठी न.पा.मुख्याधिकारी भरत राठोड़ यानी जि.प.मैदान सज्य केले असुन तेथेच ठेले वाले व भाजी विक्रेते यानी थांबून भाजी व फळ विक्री करावी असे आवाहान त्यानी केले आहे उदगीर येथे प्रशासनाने भाजी व फळ विक्रेत्या साठी सकाली 6 ते 11 चा वेळ दिला असुन भाजी मंडई  व अनेक ठिकाणी लोक गर्दी करत आहेत या मुळे कोरोना चा संसर्ग वाढण्याची  दाट शक्यता आहे हे लक्ष्यात घेउन न .पा.मुख्याधिकारी भरत राठोड़ यानी आपल्या कर्मचार्याच्या सहकार्याने भव्य अस्या  जि.प.मैदानावर भाजी व फळ विक्रेत्या साठी मार्किंग करुण खरेदी साठी येनारया ग्राहकात 3 फुटाचे अंतर ठेऊन कप्पे निर्माण केले असल्याने संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली असुन जनतेनी जि.प.मैदान येथूनच भाजी व फळे खरेदी करावे व कोणत्याही भाजी व फळ विक्रेत...

जिल्हाभरात 47 वाहने जप्त

जिल्हाभरात 47 वाहने जप्त परभणी,दि.28(प्रतिनिधी) ः कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोकण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदी लागू आहे. संचारबंदीचे उल्लंघन करुन अनावश्यक फिरणार्‍या 43 आरोपींवर 23 गुन्हे दाखल करण्यात आले असून 47 वाहने पोलीसांनी जप्त केली आहेत. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून 14 एप्रिल पर्यंत देशभरात संचारबंदी व जमावबंदी लागू आहे. त्या अनुषंगाने जिल्हाभरात नाकाबंदी, चेक पॉइंट लावण्यात आले असून पेट्रोलिंग सुरु आहे. विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे. सद्याच्या परिस्थीतीमध्ये कोणी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये किंवा अफवा पसरवून जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण करु नये असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. शासनाने अत्यावश्यक सेवा सुरु असून खरेदीसाठी आलेल्या दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतूकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा-सुविधांचा दुरुपयोग करुन विनाकारण काही नागरीक रस्त्यावर फिरत आ...

गोरेगावात १५० रुग्णांची मोफत तपासणी 

गोरेगावात १५० रुग्णांची मोफत तपासणी    हिंगोली -  सध्या सर्वत्र कोरोना संसर्ग विषाणूने थैमान घातल्याने शासकिय यंत्रणा जोमात कामाला लागली आहे. मात्र ग्रामीण भागातील खाजगी वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्यांना त्‍यांचे दवाखाने बंद केल्याने अनेकांच्या अडचणी होत आहेत. परंतू  गोरेगाव येथील खाजगी वैद्यकिय व्यवसायीक डॉ. दिपक पाटील गोरेगावकर यांनी विविध आजाराचे उपचारासाठी येणाऱ्या दिडशे रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली आहे.    कोरोना या विषाणू मुळे देशातील सध्याची परिस्थिती व ग्रामीण भागातील जनतेची लहान सहान आजाराने होत असलेली वैद्यकीय  गैरसोय लक्षात घेऊन येथील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉ. दिपक पाटील गोरेगावकर  यांनी  आपले हॉस्पीटल सुरू ठेवले असुन गेल्या २ दिवसात १५० पेक्षा अधिक रुग्णांची मोफत तपासणी केली. यामध्ये बरेचसे रुग्णांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली व काही गरजु लोकांना औषधी देखील देण्यात आली. यानंतर  अजुन काही दिवस सध्याची परिस्थिती ठीक होईपर्यंत मोफत आरोग्य सेवा सुरू राहील असे डॉ. दिपक पाटील यांनी सांगीतले.   या कार्याबद्दल डॉ. दिपक या...

गरजू विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पोहचवा -शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश

Image
  हिंगोली,दि.28:  कोरोना प्रादूर्भावच्या पार्श्वभूमीवर राज्यात 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशावेळी शाळेत असलेले पोषण आहार कड धान्य शाळेतील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे अधिकार शाळेच्या स्थानिक समितीकडे सोपवण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगाली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. केंद्र आणि राज्य शासनाने 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले असल्याने शाळेत विद्यार्थी नाहीत इयत्ता आठवीपर्यंत सर्व परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. अशावेळी शाळेमध्ये विद्यार्थी येत नसला तरी शाळेतील विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी राज्य शासनाने दिलेले शालेय पोषण आहाराचे धान्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्थानिक नियामक मंडळाच्या सल्ल्याने करावी. अर्थात त्यामुळे शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलिस यंत्रणेला देखील माहिती द्यावी. शाळेचा विद्यार्थी उपाशी राहू नये, हा यामागच...

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू            हिंगोली,दि.28:   दि. 02 एप्रिल, 2020 रोजी रामनवमी असल्याने दि. 6 एप्रिली, 2020 रोजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढण्यात येतात. पंरतू जिल्ह्यात कोरोना (कोविड-19) विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू आहेत. या कालावधीत विविध सण उत्सव असल्याने विविध प्रकारचे प्रश्न हाताळण्यासाठी तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 29 मार्च, 2020 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 12 एप्रिल, 2020 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी  आदेश काढले आहेत.             त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कार...

हिंगोलीत विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी

हिंगोलीत विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी   हिंगोली -  हिंगोली सह परिसरात शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यामध्ये फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.   मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी व वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने शेतकऱयांच्या हाता तोंडाशी आलेला गहू, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसऱ्या बाजूने अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या द्विधा मनस्थितीत शेतकरी संकटात सापडला आहे.मागील नुकसानीचे अनुदान मिळते न मिळतेच तोच पुन्हा अस्मानी संकट शेतकऱ्यावर आले आहे. शनिवारी देखील अर्धा तास पडलेल्या पावसाने रब्बी हंगामातील पिकासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.    जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कर्फ्यु लागू केला आहे. त्यामुळे शेतकऱयांना शेतातील काढणीस आलेले पिके काढण्यासाठी मजूर देखील मिळत नाहीत, शेतकऱ्यांना घराबाहेर पडणे सुद्धा मुश्किल झाले आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.     ...

92 पैकी 66 रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह

92 पैकी 66 रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह जिल्ह्यात शनिवार पर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नाही, 11 स्वॅब अहवाल प्रलंबित परभणी,दि.28(प्रतिनिधी) ः जिल्ह्यात कोरोना विषाणु संदर्भात 141 नागरीकांची नोंद झाली असून त्यामध्ये 92 जणांचे स्वॅब पुण्याच्या एनआयव्हीला पाठविण्यात आले होते, त्यातील 66जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून 11 अहवाल प्रलंबित आहेत. 15 जणांचे अहवाल रिजेक्ट करण्यात आले आहेत. यामध्ये परदेशातून आलेले 57 त्यांच्या संपर्कातील 05 व एकूण 141 नागरिक निगराणी खाली आहेत. या नागरीकांपैकी 14 नागरीक जिल्हा रुग्णालयाच्या विलगिकरण कक्षामध्ये दाखल आहेत. तर 114 नागरीकांना त्यांच्या घरीच होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 114 जणांची प्रकृत्ती स्थिर आहे.  त्यांच्या निवासस्थानी वैद्यकीय पथकामार्फत फेर तपासणी करण्यात आलेली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. शनिवारी 07 रुग्णांचा स्वॅब नमुना तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था(पूणे) कडे पाठविण्यात आला आहे. शनिवारी नव्याने 07 संशयित रुग्ण दाखल झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बालासाहेब नागरगोजे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली. जीवनावश्यक वस्तू, ...

सोनपेठात रोटरी क्लबकडून पोलीसांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था

Image
राहूट्यामध्ये राहणार्‍या गरजूंना केले तांदूळाचे वाटप सोनपेठ,दि.28(प्रतिनिधी) ः कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन आहे.त्यामुळे हॉटेल्स व दुकाने बंद आहेत. नागरीकांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये यासाठी पोलीसांची गस्त सुरु आहे. सोनपेठ शहरासह तालुक्यात गस्तीवर असणार्‍या अशा पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना रोटरी क्लबच्या वतीने चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  गेल्या शनिवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन आहे, यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बद आहेत. सोनपेठ येथे सकाळी 7 ते 8 या वेळेत भाजीपाला विक्री होत आहे. त्यानंतर बंद करण्यात येत आहे. नागरीकांनी गर्दी करु नये, तसेच घराबाहेर पडू नये, असे आवाहन करत पोलीस अधिकारी  व कर्मचारी शहरासह तालुक्यात गस्त घालत आहेत. गस्तीवर असणार्‍या या अधिकारी व कर्मचार्‍यांना पिण्याचे पाणी व चहा मिळावा यासाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. सोनपेठ येथील मोबाईल हॉटेल चालक राजेश गायकवाड यांच्या माध्यमातून ही व्यवस्था करण्यात आली आहे. कापड व्यापारी ज्ञानेश्‍वर डमढेरे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना मास्कचे वाटप केले. तसेच...

परराज्यातून आलेल्या बेघरांना दिले कम्युनिटी किचनमधून अन्नधान्य

Image
परभणीत आनंद भरोसे यांचा पुढाकार, गंगाखेडातही मुरकटेचे दातृत्व परभणी,दि.28(प्रतिनिधी)ः     गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतून कामासाठी आलेल्या परंतू बेघर असलेल्या 40 कुटूंबांना भाजपच्या कम्युनिटी किचन संकल्पनेतून महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी 20 दिवसांसाठी पुरेल इतके अन्नधान्य शनिवारी(दि.28) वाटप केले.गंगाखेडमध्येही संतोष मुरकुटे हे देखील पालामध्ये राहणा-या 150 कुटुंबांच्या मदतीसाठी धावून गेले. जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी पालात राहणा-या या मजूरांना गहू, तांदूळ, तेल, मसाला, साबण आदी साहित्याचे वाटप केले. यावेळी मनपाच्या गटनेत्या मंगल मुद्गलकर, संजय शेळके, माणिक शिंदे, विशाल बोबडे, कोडिंबा कुंभारे, शेषराव खंदारे, धनंजय जाधव, अशोक पारवे आदी उपस्थित होते. भाजपने देशपातळीवर लॉकडाऊनमध्ये फटका बसणा-या वर्गाच्या जेवणाचा प्रश्‍न मिटविण्यासाठी कम्युनिटी किचनचे जाळे उभारले असून या अतंर्गत भाजपच्या येथील पदाधिका-यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. गंगाखेडमध...