कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्याचे आवाहन
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्याचे आवाहन हिंगोली - शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2,3, व 4 मधील तरतुदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय कार्यालयास भेट देणाऱ्या सर्व अभ्यांगतांच्या भेटी दि. 31 मार्च, 2020 पर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. अभ्यांगत,नागरिकांना आपल्या कामाबाबत काही पत्रव्यवहार करावयाचा असल्यास त्यांनी संबंधीत कार्यालयास ई-मेल, दूरध्वनी व इतर तत्सम मार्गाने पत्रव्यवहार करावा अथवा संपर्क साधावा. तसेच सर्व कार्यालय प्रमुखांनी जास्तीत-जास्त कार्यालयीन कामकाज हे ई-मेल, दूरध्वनी व इतर तत्सम मार्गाने करावे. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी कोणत्याही कारणाने कार्यालयात किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रात गर्दी जमणार नाही याकरीता आवश्यक ते सर्व उपाय करावेत. कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने या आदे...