Posts

Showing posts from March 1, 2020

हिंगोली शहरासह परिसरात अवकाळी पावसाच्या सरी

Image
हिंगोली शहरासह परिसरात अवकाळी पावसाच्या सरी आठवडी बाजारात उडाली धांदल - हिंगोली -  शहर व परिसरात रविवारी (ता.1) सायंकाळी सात वाजता मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या या पावसाने शहरातील अकोला बायपास भागात सुरू असलेल्या आठवडी बाजारात खरेदी विक्रीसासाठी आलेल्या नागरीक व ग्राहकांची धादंल उडाली. रात्री उशीरापर्यत हा पाऊस शहरात सुरूच होता.  हिंगोली शहरासह जिल्‍ह्‍यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सातच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या अकोला बायपास भागात पावसाचा जोर अधिक होता पंधरा ते वीस मिनीट झालेल्या या पावसाने येथे सुरू असलेल्या आठवडी बाजारात मोठी धादंल उडाली  अकोला बायपास भागात दर रविवारी आठवडी बाजार भरतो तो रात्री उशीरापर्यंत सुरू असतो. आज झालेल्या अवकाळी पावसाने बाजारात धादंल उडाली होती.  दरम्यान हा पाऊस शहरासह तालुक्‍यातील बळसोंड, पिंपरखेड, कारवाडी, खांबाळा तसेच कळमुनरी शहरात देखील पाऊस झाला. सध्या शेतशिवारात रब्‍बीतील हरभरा पिकाच्या काढणीची कामे काही ठिकाणी सुरू असल्याने शेतकऱ्याची अवकाळी पावसाने गैरसोय झाली. शहरात पाऊस सुरू झाल्यावर अनेक भागातील...

हिंगोलीत दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात

हिंगोलीत दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात ५३ परीक्षा केंद्रावर १८हजार विद्यार्थी देणार परीक्षा , शिक्षण विभाग सज्ज हिंगोली - माध्यमिक शालांत प्रमाणपत्र २०२० परीक्षेला  मंगळवारी (ता.३) सुरुवात होत असून ,शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यात ५३ परीक्षा केंद्रावर अठरा हजार २२७ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी पी. बी.पावसे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद मार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२० ला मंगळवार पासून सुरुवात होत आहेत.या परीक्षा (ता.३) ते (ता.२३) या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.यासाठी परीक्षा विभागाने जय्यत तयारी सुरु केली असून, बारावीच्या धर्तीवर भरारी व बैठे पथकाची देखील स्थापना केली आहे. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी परीक्षा विभाग जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे प्रभारी सीईओ धनवंत कुमार माळी, शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे, डायट प्राचार्य, पुटवाड आदी अधिकारी काम पाहत आहेत. मंगळवारी( ता.३) प्रथम भाषा मराठी,हिंदी, उर्दू विषयाचा प...

औंढ्यातील  ग्रामीण रुग्णालय सलाईनवर

Image
औंढ्यातील  ग्रामीण रुग्णालय सलाईनवर  औषधीचा तुटवडा ,रुग्णांची गैरसोय औंढा -  येथील ग्रामीण रुग्णालय सला इनवर असून औषधांचाही तुटवडा झाला आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कुठलेही औषध मिळत नसल्यामुळे रुग्णाची गैरसोय होत असल्याची तक्रार नगरसेवकाने केली आहे.   ग्रामीण रुग्णालयाचा  कारभार अलबेल झाला असून ,सिस्टरच डॉक्टर झाले असल्याने  रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. यावर मात्र वैद्यकीय अधिक्षक  यांचा कुठलाही वचक नसल्यामुळे वैद्यकीय अधीक्षक हे पूर्णवेळ औंढा  रुग्णालयातच असावे अशी मागणी केली आहे .औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र असून येथे देशातील नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त श्री नागनाथाच्या दर्शनासाठी येत असतात. औंढा शहरातील व परिसरातील येणाऱ्या भक्तांचे व नागरिकांचे उपचार करण्यासाठी शहरात एकमेव ग्रामीण रुग्णालय असून सदरील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रेमानंद निखाडे हे आठ दिवसही औंढा ग्रामीण रुग्णालयात हजर रहात नाहीत.  यावरही त्यांना कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. यामुळे ...

तालुकास्तरीय गो- गर्ल स्पर्धेत १५० खेळाडूंचा सहभाग फिट इंडिया अंतर्गत केले जाते स्पर्धेचे आयोजन

Image
तालुकास्तरीय गो- गर्ल स्पर्धेत १५० खेळाडूंचा सहभाग फिट इंडिया अंतर्गत केले जाते स्पर्धेचे आयोजन हिंगोली -  केंद्र शासनाच्या फिट इंडिया अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय १००मीटर धावणे स्पर्धेत शनिवारी (ता.२९) १५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेच्या मैदानावर शनिवारी (ता.२९) गो-गर्ल १००मीटर धावणे स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रूपालीताई पाटील गोरेगावकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री. जी. व्ही. गुंडेवार, श्री.पंडित अवचार,श्री. सानप,श्री. खडसे, आदींची उपस्थिती होती.तर पंच म्हणून श्री.रमेश गंगावणे, रामप्रकाश व्यवहारे,श्री. संजय भुमरे, श्री.लोळेवार ,श्री.गंडाफळे ,श्री. पाईकराव, आदींनी काम पाहिले. या तालुकास्तरीय स्पर्धा तीन वयोगटात खेळविण्यात आल्या. यामध्ये ६ ते ९ वर्ष, १० ते १३ वर्ष व १४ ते १८ वर्षातील मुलीनी सहभाग नोंदवला.तालुकास्तरीय तिन्ही गटातील प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला जिल्हस्तरावर निवड केली जाईल. त्यानंतर जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राज्यपातळीवरील स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्या...