Posts

Showing posts from February 11, 2020

तुला खतम करतो म्हणत पतीने पेटविले पत्नीला; रुग्णालयात मृत्यूशी झुंज

Image
तुला खतम करतो म्हणत पतीने पेटविले पत्नीला; रुग्णालयात मृत्यूशी झुंज     हिंगोली- दिवसेंदिवस महिलांना पेटविण्याच्या घटनात  मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीत कांडाच्या घटनेने तर संपूर्ण महाराष्ट्र सून झाला असताना अशीच एक घटना हिंगोली जिल्ह्यातील आडगाव मुटकुळे येथे घडली, यात  घरातील किरकोळ वादातुन पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यात महिला ७८ टक्के भाजली असून, तिच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.    संगीता (२६) असे मृत्यूशी झुंज देणाऱ्या महिलेच नाव आहे. संगीताचे माहेर हे गुगुळ पिंपरी असून, आठ वर्षांपूर्वी शंकर यांच्या सोबत विवाह झाला होता, या दाम्पत्याना एक मुलगा एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत. सुरुवातीला सुरळीत चालनाऱ्या  संसाराला कुणाची तरी नजर लागली अन मागील काही दिवसापासून किरकोळ वादावरून घरात वादंग उठत गेले हे वादंग एवढे वाढत गेले की,  चक्क  पत्नी घरात एकटी पाहून नवऱ्याने घरात धाव घेतली हातात रॉकेलची कॅन घेऊन पत्नीच्या अंगावर भडाभडा ओतली...

तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस लोक अदालत बैठकीला गैरहजर राहणे भोवले

तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस लोक अदालत बैठकीला गैरहजर राहणे भोवले हिंगोली - येथील जिल्हा न्यायालयात बुधवारी( ता.८) लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. मात्र या महत्वाच्या बैठकीला गैर हजर राहिल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी (ता.१०) तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येथील जिल्हा न्यायालयात बुधवारी (ता.८) औरंगाबाद येथील उच्य न्यायालयाच्या वतीने भूसंपादनाचे मावेजा बाबतचे प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालत मध्ये तडजोड करून निकाली काढण्याबाबत सर्वांना सूचना दिल्या होत्या. तसेच चार फेब्रुवारी रोजी मावेजा बाबत प्रकरणे निकाली काढण्याबाबत उपस्थित राहण्याबाबत सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदेचे लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कळविले देखील होते.मात्र या तिघांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये गैर हजर राहिल्याने प्रकरणे निकाली काढणे श्यक्य झाले नसल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या तिघा कार्यकारी अभियंताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी लोक अदालत मध्ये उपस्थि...

तर 35 हजार नळधारकांचे 10 कोटी वाचू शकतात

Image
तर 35 हजार नळधारकांचे 10 कोटी वाचू शकतात नव्या नळ जोडणीत सरसकट दर नको, सचिन देशमुख यांची मागणी परभणी,दि.11(प्रतिनिधी)ः शहराच्या नव्या पाणीपुऱवठा योजनेत जोडणी घेतांना अनामत रक्कमे व्यतिरिक्त सरसकट 9 हजार रुपये दर महापालिकेने आकारल्यामुळे गरज नसतांनाही सर्वांना ते लागू पडणार आहेत. यामुळे 35 हजार नळधारकांचे तब्बल 10 कोटी 50 लाख रुपये जास्तीचे जाणार आहेत. गरजेच्या साहित्याप्रमाणे दर आकारणी केल्यास हे पैसे वाचू शकतात, असा दावा नगरसेवक सचिन देशमुख, प्रसाद नागरे यांनी केला आहे.        महापालिकेने नव्या नळ जोडण्या देताना अनामत रक्कम 2 हजार रुपये व जोडणीचे काम करण्यासाठी एजन्सीला 9 हजार रुपये प्रति जोडणी देण्याचे निश्‍चीत केले आहे. यात एजन्सीने 15 मिटर पाईप, नळजोडणीसाठी लागणारे सर्व साहित्य, खोदकाम व कनेक्शन दिल्यानंतर मिटर बसविणे आदी कामे केली जाणार आहेत. या शिवाय ही जास्तीचा लागणारा खर्च नागरिकांकडूनच वसुल केला जाणार आहे. सध्या 27 हजार नळधारक आहेत. नव्याने नळ घेणा-यांची संख्या ही मोठी आहे. परंतू त्यांना हे दर परवडणारे नाहीत.  रस्त्याच्या एका बाजुला असणा-या नळधारकांना ...

आता ऍट्रॉसिटी कायद्यानुसार तात्काळ अटक आणि अटकपूर्व जामीनालाही बंदी

Image
ऍट्रॉसिटी कायद्यात केंद्र सरकारने केलेल्या दुरुस्तीला घटनात्मक मान्यता देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत - रामदास आठवले आता ऍट्रॉसिटी  कायद्यानुसार तात्काळ अटक आणि अटकपूर्व  जामीनालाही बंदी ऍट्रोसिटी कायद्यात दुरुस्ती करून हा कायदा अधिक मजबूत करणाऱ्या तरतुदी केंद्र सरकार ने केल्या आहेत. त्या दुरुस्ती असंवैधानिक असल्याचा  ठपका  ठेवणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायलायाने  आज निकाल देताना या तरतुदी संविधानाच्या चौकटीत असल्याचा निकाल दिला आहे. या निकालामुळे केंद्र सरकार ने ऍट्रोसिटी कायद्याला अधिक सक्षम करण्यासाठी केलेल्या दुरुस्तीला घटनात्मक दर्जा मिळाला असून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे देशभरातील आंबेडकरी जनतेच्या वतीने  स्वागत करीत असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.  अट्रोसिटी कायद्याच्या दुरुस्ती नुसार आता अट्रोसिटी कायदा 1989 नुसार  कोणत्याही चौकशी शिवाय गुन्हा दाखल करता येणार आहे तसेच...

तेरा वर्षानंतर औसा येथे होणार आमसभा जनतेचे प्रश्न मार्गी लागण्याची आशा -राजेंद्र मोरे

  जनतेचे प्रश्न मार्गी लागण्याची आशा -राजेंद्र मोरे    औसा/ प्रतिनिधी: जवळपास 13 वर्षांच्या कालखंडानंतर आमदारांच्या उपस्थितीत औसा येथे आमसभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्‍न सुटण्याची आशा निर्माण झाली असून तालुक्यातील जनतेने या सभेस उपस्थित राहून आपले प्रश्न सोडवून घेण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लातूर व उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र मोरे यांनी केले आहे.  राजेंद्र मोरे यांनी म्हटले आहे की, बारा-तेरा वर्षांपूर्वी दिनकरराव माने आमदार असताना औसा येथे आमसभा झाली होती. त्यानंतर दहा वर्षांच्या कार्यकाळात बसवराज पाटील यांनी एकही आमसभा घेतली नाही . आ .अभिमन्यू पवार यांनी मात्र आमसभेसाठी पुढाकार घेतला असून बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी ही सभा होणार आहे. आ. धीरज देशमुख हे देखील या सभेस उपस्थित राहणार आहेत . तालुक्यातील नागरिकांना विविध अडचणी आहेत .त्यावर या सभेत चर्चा होणे अपेक्षित आहे. पंतप्रधान आवास योजनेतील घरकुले ,विहीरी यासह ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते या संदर्भात प्रश्न आहेत.तालुक्यात निराधार आणि अपंगांचेही प्र...