हिंगोलीत नव्याने ३२ रुग्ण वाढले तर नऊ रुग्णांना सुट्टी

हिंगोलीत नव्याने ३२ रुग्ण वाढले
तर नऊ रुग्णांना सुट्टी
 
हिंगोली - जिल्ह्यात सोमवारी नव्याने ३२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यातील वीस रुग्ण हे आरटीपीसीआरटी तापसणीत आढळून आले आहेत .तर पाच रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले आहेत. नऊ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.


जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सोमवारी प्राप्त झालेल्या  अहवालानुसार  आरटीपीसीआर तापसणीत २७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसर सात ,वसमत परिसर सात,कळमनुरी परिसर १३ असे एकूण २७ रुग्ण  पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये एकूण पाच रुग्ण सापडले असून, यात हिंगोली एक, औंढा एक, सेनगाव तीन असे एकूण पाच रुग्णांचा समावेश आहे.


तर आज नऊ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली .यामध्ये हिंगोली आयसोलेशन वॉर्ड येथील पाच ,कोरोना केअर सेंटर वसमत चार
  असे एकूण नऊ  रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.


सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी २६ रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोरोनाच्या पाच  रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण ३१ रुग्णांची  प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
     
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण १७४४ रुग्ण झाले असून, त्यापैकी १४१० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण ३१४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत २० रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ.किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा