शुक्रवारी नव्याने ४६ रुग्ण पॉझिटिव्ह तर ७२ रुग्णांना सुट्टी

शुक्रवारी नव्याने ४६ रुग्ण पॉझिटिव्ह तर ७२ रुग्णांना सुट्टी 
 
हिंगोली - जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने ४६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यातील ३४ रुग्ण हे आरटीपीसीआरटी तपासणीत आढळून आले आहेत .तर १२ रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले आहेत. ७२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याचे  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले.


जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून शुक्रवारी( ता.१८) प्राप्त झालेल्या  अहवालानुसार  आरटीपीसीआर तपासणीत ३४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यामध्ये  वसमत परिसर सहा ,कळमनुरी परिसर २८
असे एकूण ३४ रुग्ण आढळून आले आहेत. तर रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये एकूण १२ रुग्ण सापडले असून, यात हिंगोली परिसरातील १२ रुग्णांचा समावेश आहे.


तर आज तब्बल ७२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली .यामध्ये हिंगोली आयसोलेशन वॉर्ड येथील २० ,कोरोना केअर सेंटर वसमत पाच,कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथील ४४,तर सेनगाव सेन्टर येथील तीन असे एकूण ७२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे.


सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी १८ रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोरोनाच्या सात  रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण २५ रुग्णांची  प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
     
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण २२६१ रुग्ण झाले असून, त्यापैकी १९१६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण ३१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत २९ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ.किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा