दिलासा;  हिंगोली, शुक्रवारी १२ कोरोना पॉझिटिव्ह ,८ रुग्णांची कोरोनावर मात

दिलासा;  शुक्रवारी १२ कोरोना पॉझिटिव्ह ,८ रुग्णांची कोरोनावर मात


हिंगोली -   प्राप्त अहवालानुसार  जिल्हयात शुक्रवारी नव्याने एकुन १२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी नऊ रुग्ण हे रेपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे तर तीन  रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत व आठ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली  असल्याची माहिती डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.त्यामुळे आरोग्य यंत्रणेला थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे.


रॅपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे घेण्यात आलेल्या तपासणी मध्ये फलटन हिंगोली एक बासंबा ता. हिंगोली दोन, बसस्टँड कळमनुरी पाच, ब्राह्माण गल्ली कळमनुरी एक असे नऊ रुग्ण अँटीजन रॅपिड तपासणीतून आढळून आले आहेत. तर आरटी पीसीआर व्दारे आढळून आलेल्या असोनंडा औंढा एक, शिवाजीनगर सेनगाव एक, रामगल्ली हिंगोली एक, असे तीन रुग्ण मिळून आले आहेत. 


 आज रोजी एकुन आठ रुग्ण ठणठणीत बरे  झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषद वसाहत दोन, तोफखाना तीन, गाडीपुरा एक, पेन्शनपुरा एक, महादेववाडी एक अशा आठ जणांचा समावेश आहे.


 जिल्हयात आजघडीला एकुण   ८०८ रुग्ण झाले आहेत . त्यापैकी ५६३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांनासुट्टी देण्यात आली आहे .आजघडीला एकुन २३७ रुग्णांवर उपचार चालु आहेत ,आणि ८ रुग्णाचा मृत्यु झाला असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.


जिल्हा सामान्य रुग्णालयातील 
आयसोलेशन वॉर्ड येथे भरती असलेल्या पैकी सात रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन सुरु आहे. तर पाच रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायप्याप वर ठेवण्यात आले आहे. आज एकूण१२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा