चिंताजनक ; हिंगोलीत नव्याने २५ कोरोना पॉझिटिव्ह, तर १६ रुग्ण कोरोनामुक्त

चिंताजनक ; हिंगोलीत नव्याने २५ कोरोना पॉझिटिव्ह  ,तर १६ रुग्ण कोरोनामुक्त


हिंगोली - रविवारी  प्राप्त अहवालानुसार  हिंगोली जिल्हयामध्ये नव्याने एकुन २५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी तीन रुग्ण हे रेपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे व  २२  रुग्ण आरटीपीसीआर टेस्ट द्वारे आढळून आले आहेत,तर १६  रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली  असल्याची माहिती डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.


रॅपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे घेण्यात आलेल्या तपासणी द्वारे विद्यानागर ,इंदिरा नगर कळमनुरी प्रत्येकी  एक,तर औंढा नागनाथ ता जिंतूर भिलज येथील एक असे तीन रुग्ण सापडले आहेत.



आज रोजी एकुन ४३  रुग्ण ठणठणीत बरे  झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन येथील आठ,कोरोना केअर सेंटर लिंबाळा दोन, तर कळमनुरी केअर सेंटर येथील ३३ जवान कोरोनामुक्त झाले आहेत. असे एकूण ४३ रुग्ण आज बरे झाले आहेत. तर आरटीपीसीआर द्वारे घेण्यात आलेल्या मध्ये जिल्हा रुग्णालय हिंगोली दोन,पोस्ट ऑफिस हिंगोली एक,सरस्वती नगर एक,फलटण, गंगानागर ,तालाबकट्टा प्रत्येकी एक,गणेशवाडी एक, जिल्हा परिषद वसाहत तीन,राहोली ता. हिंगोली एक,इडोळी एक,देऊळगाव रामा ता. औंढा एक,वसमत नगर दोन,
बँक कॉलनी वसमत एक, सहारा पेठ वसमत एक,मदिना नगर कळमनुरी एक, औंढा शहर दोन, असे एकूण २२ रुग्ण आढळले आहेत.


आज रोजी एकूण१६ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.यामध्ये आयसोलेशन वॉर्ड हिंगोली सहा, कोरोना केअर सेंटर कळमनुरी नऊ, तर नांदेड येथे एका संदर्भीत रुग्णाला पाठविले आहे. बरे झालेल्यात जिल्हा परिषद वसाहत दोन, तोफखाना एक, तालाबकट्टा एक, खड्कपुरा एक, काबरा जीन एक,फलटण एक, बुरसे गल्ली कळमनुरी नऊ अशा सोळा ररुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.आज पर्यंत हिंगोली जिल्हयात एकुण ८४०  रुग्ण झाले आहेत . त्यापैकी ६२२ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांनासुट्टी देण्यात आली आहे .आज घडीला एकुन २०९ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि नऊ रुग्णाचा मृत्यु झाला असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.


जिल्हा सामान्य रुग्णालयातील 
आयसोलेशन वॉर्ड येथे भरती असलेल्या पैकी आठ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन सुरु आहे. तर  दोन रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायप्याप वर ठेवण्यात आले आहे. आज एकूण दहा रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा