जिल्ह्यात कोरोनाचे नवीन तेरा  रुग्ण; तर बत्तीस रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज  तर एक जणांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाचे नवीन तेरा  रुग्ण; तर बत्तीस रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज
 तर एक जणांचा मृत्यू


 हिंगोली - जिल्ह्यात आज तेरा नवीन कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी मंगळवारी  दिली आहे.


  आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार वसमत परिसर दोन व्यक्ती रॅपीड अँटीजन टेस्ट द्वारे, तर हिंगोली परिसरातील आठ व्यक्ती आणि कळमनुरी परिसर तीन असे एकूण ११ व्यक्ती आरटीपीसीआर टेस्टद्वारे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर आज ३२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एका ५८ वर्षीय पुरुष यांचा कोरोनामुळे आज जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे.


 सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी १४ रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोरोनाच्या चार  रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण १८ रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
     
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण एक हजार ३६२रुग्ण झाले असून, त्यापैकी एक हजार १५९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण १८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोना मुळे जिल्ह्यात आतापर्यंत सतरा व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी कळविले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा