गुरुवारी नव्याने २५ रुग्ण वाढले तर १३ रुग्णांना सुट्टी

गुरुवारी नव्याने २५ रुग्ण वाढले तर १३ रुग्णांना सुट्टी
 
हिंगोली - जिल्ह्यात गुरुवारी नवीन २५  कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यातील सर्व रुग्ण हे  आरटीपीसीआरटी तापसणीत सापडले आहेत .तर १३ रुग्णांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे.


 जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली  परिसर सात रुग्ण यामध्ये आनंदनगर ,मंगळवारा, रिसाला बाजार, खांबाळा,पोळा मारोती, डिग्रस कऱ्हाळे यांचा समावेश आहे. तर वसमत परिसरात सतरा रुग्ण आढळून आले आहेत. यात सहारा पेठ येथे १६ तर म्हातारगव्हाण येथे एक असे१७ रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय कळमनुरी परिसरात वारंगा मसाई येथे एक रुग्ण यांचा समावेश आहे. तर गुरुवारी १३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली .यामध्ये हिंगोली आयसोलेशन वॉर्ड येथील आठ , वसमत कोरोना केअर सेन्टर येथील एक , तर कळमनुरी सेंटर येथील चार  असे एकूण १३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.


सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी १३ रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोरोनाच्या ३  रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण १६ रुग्णांची  प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
     
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण एक हजार ३९४ रुग्ण झाले असून, त्यापैकी एक हजार २०९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण १६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १८ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा