कही खुशी कही गम ; हिंगोलीत गुरुवारी आणखी ५ रुग्ण बाधित , ९ रुग्णांना सुट्टी, सात मृत्यू
कही खुशी कही गम ; हिंगोलीत गुरुवारी आणखी ५ रुग्ण बाधित, ९ रुग्णांना सुट्टी
आतापर्यन्त सात रुग्णांचा कोरोनाने मृत्यू ,
हिंगोली - जिल्हयात प्राप्त आकडेवारीनुसार गुरुवारी नव्याने एकुन पाच बाधित रुग्ण आढळुन आले आहेत. तर नऊ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यन्त जिल्ह्यात सात रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याने जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.तर एकीकडे कही खुशी ,कही गम अशी परिस्थिती आहे.
जिल्हा रुग्णालयाकडून गुरुवारी प्राप्त अहवालानुसार नऊ कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे . यामध्येजिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डातील दोन पैकी हिंगोली आझम कॉलनी एक व वसमत येथील शुक्रवार पेठ असे दोन रुग्ण, वसमत कोरोना केअर सेन्टर येथील दोन रुग्ण बरे झाले आहेत, यामध्ये शिरली एक, पळस गाव एक यांचा समावेश आहे. तसेच लिंबाळा सेंटर येथील गवळीपुरा येथील पाच रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.
आज रोजी हिंगोली जिल्हयात पाच नवीन कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत . यामध्ये हिंगोली शहरातील तापडिया एनटीसी येथील तिघा जणांना कोरोना ची बाधा झाली असून यात २५, २४,३७ पुरुष, यांचा समावेश आहे. तर पळशी रोड परिसरात असलेल्या काबरा जिनिंग येथे एका २२ वर्षीय पुरुषाला लागण झाली आहे. तसेच वसमत तालुक्यातील बाराशिव येथे एका ३५ वर्षाच्या पुरुषाला लागण झाली आहे. आज रोजी पाच रुग्ण नव्याने आढळून आले आहेत तर नऊ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
हिंगोली जिल्हयात कोरोनाचे एकुण ५९८ रुग्ण झाले आहेत . त्यापैकी ४३० रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व आज घडीला एकुन १६१ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि ७ कोऱोना रुग्णाचा मृत्यु झाला आहे . हिंगोली जिल्हयातंर्गत आयसोलेशन वार्ड , सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकुन
७३८१ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे . त्यापैकी ६५५४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत . ६८१८ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे . सद्यस्थितीला ५४२ व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी २४९ जणांचे अहवाल येणे , स्वॅब घेणे प्रलंबित आहे . सात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे .
आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुणालय हिंगोली येथे भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी १५ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले आहे. तर दोन रुग्णाची अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायप्याप मशीन वर ठेवले आहे. एकूण१७ रुग्णाची
प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.