दिलासादायक ; तीन योध्याची कोरोनावर मात, पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख घसरतोय
दिलासादायक ; तीन योध्याची कोरोनावर मात
जिल्ह्यातील रुग्ण संख्या पोहचली ३० वर ,पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख घसरतोय
हिंगोली - सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती केलेल्या रुग्णा पैकी बाराशिव दोन व
नागेशवाडी एक अशा एकूण तीन रुग्णाची तब्येत ठणठणीत बरे झाल्याचा अहवाल मंगळवारी आरोग्य यंत्रणेकडे प्राप्त झाला असून त्यांना घरी सुट्टी देण्यात आली.त्यामुळे पॉझिटिव्ह आलेख घसरत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी दिली. यामुळे आता केवळ ३० कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांनी २०१ चा आकडा पार केला होता. त्यापैकी १७१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला एकूण ३० रुग्णावर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात विविध ठिकाणी भरती केलेल्या रुग्णात यामध्ये हट्टा दोन, गिरगाव दोन, कुरुडवाडी एक, हयातनगर चार,कौठा एक,वसमत शहर एक,अश्या एकूण११ रुग्णाचा समावेश आहे.या सर्वांची प्रकृती ठणठणीत असून कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार करण्यात येत असलेल्या रुग्णामध्ये एकूण १८ रुग्ण आहेत.यात सुरेगाव एक, पहेनी दोन, चोंढी खुर्द पाच, सेनगाव तीन,दोन रिसाला,नगर परिषद हिंगोली चार, औरंगाबाद हॉस्पिटल एक अश्या १८ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यन्त जिल्ह्यातील कोविड सेंटर येथे २५२६ रुग्णांना भरती करण्यात आले आहे.त्यापैकी २१५२ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तर २२१२ रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून,सद्य स्थितीला ३०१ रुग्ण भरती आहेत .१८९ रुग्णाचे अहवाल प्रलंबित असल्याचे सांगितले.