दिलासादायक ; हिंगोलीत एकाच दिवशी दहा रुग्ण निगेटिव्ह तर तीन पॉझिटिव्ह


दिलासादायक ; हिंगोलीत एकाच दिवशी दहा रुग्ण निगेटिव्ह तर तीन पॉझिटिव्ह


रुग्ण संख्या पोहचली २५ वर ,कही खुशी कही गम


हिंगोली -  जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड व कोरोना केअर सेन्टर येथे ३५ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु होते. मात्र गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास अहवाल प्राप्त होताच  दहा रुग्ण निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. तर मुंबई वरून वसमत तालुक्यात परतलेल्या तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यात बारा वर्षीय मुलीचा समावेश असून आता रुग्ण संख्या २५ वर गेली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकितस्क डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी पत्रकारांना दिली. त्यामुळे जिल्ह्यात कही खूसी कही गम अशी परिस्थिती आहे.


दरम्यान, कळमनुरी कोरोना केअर सेंटर येथे सुमारे आठ  रुग्ण कोरोना बाधित होते. यामध्ये घोडा कामठा, कांडली एक, चाफनाथ एक, आडा एक, येडसी तांडा येथील रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आलेल्या पैकी गंगानगर व सेनगाव तालुक्यातील माझोड येथील एक रुग्ण असे एकूण दोन रुग्ण ठणठणीत झाल्याने घरी सुट्टी देण्यात आली. अजरोजी दहा रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.


तसेच सेनगाव तालुक्यातील
 क्वारंटाईन येथे उपचारसाठी दाखल केलेल्या एका १७ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सदरील विद्यार्थी व पालक मुंबई येथून दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे वसमत हयात नगर येथील क्वारंटाइन केलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पस्ट झाले आहे. यात एका बारा वर्षाच्या  मुलगी सह२३ वर्षाच्या पुरुषाचा यात समावेश आहे.


आजघडीला एकूण दहा रुग्ण निगेटिव्ह आल्याने सद्य स्थितीला २५ रुग्णावर उपचार सुरू असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा कोरोना मुक्ती कडे वाटचाल करीत असल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.


जिल्हा अंतर्गत कोविडची लागण झालेल्या कोअर सेंटर मध्ये भरती करण्यात आलेल्या  रुग्णा मध्ये  एकूण वसमत मध्ये  एकूण १४ रुग्णा मध्ये हट्टा चार,गिरगाव दोन,अकोली एक,कुरुंदवाडी एक,
हयात नगर चार,कौठा एक,वसमत शहर एक,यांचा समावेश आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत.



याशिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचारसाठी दाखल करण्यात आलेल्या मध्ये सुरेंगाव तीन, 
 पहेनी दोन, चोंढी खुर्द एक, बाराशिव दोन, रिसाला बाजार एक, अश्या अकरा कोरोना लागण झालेल्या रुग्णांचा समावेश  असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



जिल्ह्यात २३९२ कोरोना बाधा झालेल्या रुग्णांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी २१०० रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. यातील २१३४ रुग्णांची प्रकृती ठणठणीत बरी झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला २९१ रुग्ण भरती असून २११ जणांचा अहवाल येणे बाकी असल्याचे जिल्हा शल्य चिकितस्क डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी सांगितले. आज पुन्हा एकाच दिवशी  १० रुग्ण बरे झाल्याने जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.परंतु दुसरीकडे क्वारंटाइन केलेल्या तिघांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा