मुंबई, औरंगाबाद येथून गावी परतलेल्या आठ जण कोरोना पॉझिटिव्ह
चिंताजनक ; हिंगोलीत पुन्हा मुंबई, औरंगाबाद येथून गावी परतलेल्या आठ जण कोरोना पॉझिटिव्ह
कोरोना बाधितांची संख्या गेली२५ वर
हिंगोली - मुंबई येथून कळमनुरी येथे क्वारंटाइन केलेल्या सात जणांना तर औरंगाबाद येथून वसमत येथे गावी परतलेल्या २८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल सोमवारी रात्री प्राप्त झाला. यात दोन किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. आता कोरोना बाधित रुग्ण संख्या २५ पोहचली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी मंगळवारी (ता.२३) दिली. परत पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
वसमत येथील क्वारंटाईन सेंटर अंतर्गत चंदगव्हाण गावातील एका ३८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण
झाली आहे. सदरील व्यक्ती औरंगाबाद शहरातून गावात
परतला आहे. कळमनुरी क्वारंटाईन सेंटर अंतर्गत सात व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यातील पाच
व्यक्ती कवडा गावातील रहिवासी असून सर्व पुरुष २१,२८,२१,१६ वर्षाचे आहेत. हे सर्वजन मुंबई येथून गावाकडे परतले आहेत.
दोन व्यक्ती गुंडलवाडी गावातील रहिवासी असून दोघेही किशोरवयीन मुले वय १५ व १७ वर्ष आहे. यांचा परिवार ठाणे मधून गावी परतला आहे. आणी सर्वजण आल्यापासून
क्वारंटाईन सेंटर मध्ये भरती आहेत.
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे एकूण २४८ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २२३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना
डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज घडीला २५ रुग्णावर उपचार चालु असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.
हिंगोलीतील सर्व नागरीकांना आवाहान करण्यात येते की,
अंत्यत इमरजन्सी असल्याशिवाय घरा बाहेर पडू नये व आवश्यक
सेवा वगळता इतरांना घरीच थांबून मोलाचे सहकार्य करावे तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर
आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून घ्यावे जणे करून आपल्या सभोवती कोरोना बाधीत रुग्ण असल्यास
आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते असे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.
दरम्यान, सोमवारी ११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने जिल्ह्यात
दिलासा मिळाला होता मात्र परत रात्री उशीराने आठ जण कोरोना बाधीत झाल्याने परत बाधीतांच्या संख्येत भर
पडली आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचे मिटर कमी अधिक होणे सुरूच आहे. यात बाहेर गावातून
येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधीक आहे. मुंबई, पुणे व औंरगाबाद येथून जिल्ह्यात येणारे बहुतांश बाधीत निघत असल्याचे चित्र आहे.