लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल
लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल
हिंगोली - तालुक्यातील केसापुर शेत शिवारातील गट क्रमांक २९१,२९२,३०२,व ३०७ मधील शेताचा त्याच्या आईच्या व बहिणीच्या हक्कसोड पत्रा प्रमाणे जमिनीचा पेर त्याच्या भावाच्या नावाने घेऊन तसा सातबारा तयार करून देण्यासाठी घोटा सज्जाचे तलाठी सात हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती .मात्र लाचेची रक्कम स्वीकारण्यास संशय आल्याने नकार दिला. त्यावरून एसीबीच्या पथकाने गुरुवारी (ता.२८) सापळा रचून तलाठ्यावर गुन्हा दाखल केला आहे. चार दिवसातील ही लाचखोरीची दुसरी घटना आहे.
दरम्यान, जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या वतीने कितीही डोके फोडून, किंवा जनजागृती करून देखील लाच खोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कितीही कारवाई केली तरी अधिकारी यांच्याकडून लाच घेणे काही थांबत नाही. सध्या लाचेच्या बाबतीत बघायला गेले तर महसूल विभाग अव्वल असून त्या खालोखाल पोलीस विभाग, त्यानंतर पंचायत विभागाकडे पाहिले जाते.
हिंगोली तालुक्यातील केसापुर शेत शिवारातील गट क्रमांक२९१,२९२,३०२,३०७,मधील शेताचा त्याच्या आई व बहिणीचे हक्कसोड पत्रा प्रमाणे जमिनीचा फेर
त्याच्या भावाच्या नावाने घेऊन तास सातबारा तयार करून देण्यासाठी घोटा सज्जाचे तलाठी गवई यांनी तक्रादाराकडे सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्याने थेट लाचलुचपत कार्यालय गाठून तलाठी विरुद्ध
तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली होती. यावेळी बहिणीचे हक्कसोड पत्रा प्रमाणे भावाच्या नावाने सातबारा तयार करून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती पाच हजार रुपये स्वीकारण्यास तलाठी गवई याने समंती दिली.
त्यानुसार लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक हनुमंत गायकवाड, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, पोलिस निरीक्षक ममता अफुणे व इतर कर्मचाऱ्याच्या पथकाने( ता.२८) केसापुर शेतशिवारात सापळा रचला होता. मात्र लोकसेवक गवई यास संशय आल्याने पाच हजाराची लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला.त्यामुळे पडताळणी अंती लाचखोर तलाठी लाच माघितल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर लाचेची मागणी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी देखील २०१२ मध्ये लाच स्वीकारल्या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पुन्हा हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.